• Mon. Sep 14th, 2026

अहमदनगरच्या शेतकऱ्याचं पुढचं पाऊल, पिवळ्या कलिंगडाची शेती;पुण्या-मुंबईसह राज्याबाहेर मागणी

अहमदनगरच्या शेतकऱ्याचं पुढचं पाऊल, पिवळ्या कलिंगडाची शेती;पुण्या-मुंबईसह राज्याबाहेर मागणी

अहमदनगर : एका तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेती करत सर्व शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. टाकळीमानुर येथील युवा शेतकरी संदीप रोडे यांनी त्यांच्या दीड एकर शेती क्षेत्रामध्ये पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने फळ शेती केली आहे. या दीड एकर शेत जमिनीमध्ये कलिंगडाच्या आरोही, सरस्वती आणि विशाला या तीन जातीच्या कलिंगडाचं उत्पादन घेतलं आहे. या तीनही जातीच्या कलिंगडाचे रंग वेगवेगळे असून पिवळ्या रंगाचं कलिंगड आतून लाल आहे. तर हिरव्या रंगाचं कलिंगड आतून पिवळ्या रंगाचां असतं.

दीड एकर कलिंगडाची शेती करण्यासाठी त्यांना साधारण ७० ते ८० हजार रुपये खर्च आला आहे. या शेतीमधून साधारणत: ४० ते ४५ टन इतकं उत्पादन निघेल अशी शेतकऱ्याला आशा आहे.

युवा शेतकरी पहिल्या प्रयोगात यशस्वी, दोन महिने केलेल्या कष्टाचं चीज झालं, टरबूज शेतीतून ७ लाख कमावले
शेतकऱ्याने अॅग्री फाईन या कंपनीबरोबर करार केला असून कंपनी त्यांच्याकडून मार्केटच्या किमतीपेक्षा चार ते पाच रुपये किंमत जास्त देऊन माल खरेदी करणार आहे. तसंच या कलिंगडाला पुणे, मुंबई, औरंगाबाद, बेंगलोर या ठिकाणी मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मनु सिड्सचे तिनं कलिंगड हे आरोही, विशाला आणि सरस्वती असे आहेत. आरोही या वाणाचे कलिंगड वरून काळं आणि आतून पिवळा गर असलेलं आहे. याची चव अननसासारखी असून पाणीदार फळ आहे.

कडू कारलं ठरतंय वरदान; ३० गुंठ्यात कारल्यांची लागवड अन् शेतकऱ्याला लाखोंचा फायदा

विशाला या वाणाचे कलिंगड वरून पिवळं आणि आतून लाल गर असलेलं आहे. इतर कलिंगडापेक्षा हे जास्त गोड आहे. तर सरस्वती या वाणाचे कलिंगड वरून हिरवंगार आणि आतून लाल गर असलेलं आहे.

शेतकरी भावांचा एकच निर्णय गेमचेंजर ठरला,लिंबू शेतीनं सोन्याचे दिवस दाखवले, वर्षाला १० लाखांची कमाई
अॅग्रीफाय कंपनी मार्फत शेतकऱ्यांना बियाणे आणि रोप दिलं जातं. कंपनी मार्फत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं जातं. तसंच उत्पादन विक्री सुध्दा कंपनी मार्फत केली जाते. बाजार भावापेक्षा ४ ते ५ रुपये भाव वाढवून दिला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. सध्या महाराष्ट्रात कंपनी मार्फत ३५ शेतकऱ्यांनी शेती केली आहे. पुढील वर्षी कंपनी मार्फत २०० ते ३०० शेतकरी जोडले जातील. अहमदनगर जिल्ह्यातील संदिप रोडे हे कंपनी बारोबर जोडले गेलेले पहिले शेतकरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed