• Sun. Mar 8th, 2026
    कोकणासाठी मोठी बातमी! पुढचे ३-४ तास धोक्याचे, घराबाहेर पडण्याआधी सावधान…

    रत्नागिरी :राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू असताना आता हवामान खात्याकडून कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजयांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता हवामान वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तसा इशारा देण्यात आला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी वाजता हवामान विषयक शाळेत येणारे बुलेटिन जारी करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ येईल. तर यावेळी ताशी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पुढील ३-४ तासांत घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल आहे. मुंबई कुलाबा येथील हवामान वेधशाळेकडून हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    सुरत आल्याचं समजून आजी शेगाव स्थानकातच उतरल्या, पुढे २ तासांत अशी खबर आली की सगळेच हसले…
    दरम्यान, एकीकडे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक भागांमध्ये उष्णाचा तडाखा बसणार आहे. महाराष्ट्रात तर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दिल्लीत दिवसाचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    गेल्या आठवड्यात राज्यभरामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा आता हवामान खात्याने अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ कायम राहणार; ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह कोसळणार
    हवामान विभागाकडून धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यामध्ये पुणे, सातारा सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असून मराठवाड्यातील लातूर आणि अमरावती या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed