• Wed. Mar 11th, 2026
    मी राजा ठोंगे बोलतोय, दुबईहून मुंबईत ३ अतिरेकी आलेत; पोलिसांना खोटा फोन करणारा नगरमधून अटक

    अहमदनगर: दुबईहून मुंबईत तीन पाकिस्तानी अतिरेकी आले असल्याचा कॉल मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यामुळे पोलिसांसह राज्याची दहशतावाद विरोधी पथकाची यंत्रणा कामाला लागली होती. याचे रहस्य अखेर उलगडले असून अहमदनगरमधील एका प्लॉटच्या वादातून पोलिसांनी ही खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार नाशिकच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकाने खोटी माहिती देणाऱ्या यासिन याकुब सय्यद याला अटक केली आहे.यासंबंधी माहिती अशी की, ७ एप्रिल रोजी मुंबईतील पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात दुपारी १२ वाजताच्या सुमारास फोन आला होता. फोन करणाऱ्याने आपण राजा ठोंगे बोलत असल्याचे सांगत माहिती दिली की, मुंबईत दुबईवरुन पहाटे तीन व्यक्ती आले आहेत. ते अतिरेकी असून त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे. त्यातील एका व्यक्तीचे नाव मुजिब मुस्तफा सय्यद मोबाईल असे आहे. त्याचा मोबाईल नंबर आणि गाडी नंबरही त्या व्यक्तीने पोलिसांना दिला. आपण पुण्यातून बोलत असल्याचे त्याने सांगितले होते.

    त्यानुसार यंत्रणा हलली. तपास सुरू झाला. चौकशीअंतही ही माहिती खोटी असल्याचे आढळून आले. त्यामुळे फोन करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्याचा तपास सुरू करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास दहशतवाद विरोधी पथकाच्या नाशिकच्या पथकाकडे सोपविण्यात आला. या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळविली.

    भंडाऱ्यात त्रिकोणी कुटुंबाला संपवणारे सातजण जन्मभर तुरुंगात, चिमुरड्याच्या जन्मदिनीच न्याय
    त्यामध्ये असे आढळून आले की, मुजिब मुस्तफा सय्यद याचा चुलत भाऊ यासिन याकुब सय्यद याने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला ही खोटी माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खोटी माहिती देण्याचे कारण त्याला पोलिसांनी विचारले असता त्याने सांगितले की, मुजीब सय्यद व आरोपी यासीन सय्यद यांचा अहमदनगर शहरात भवानीनगर येथे साडेपाच गुंठ्यांचा वडिलोपार्जित सामाईक प्लॉट आहे. त्या प्लॉटच्या वादावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मुजीब व त्याच्या कुटुंबियांना पोलिसांकडून त्रास व्हावा या उद्देशाने खोटी माहिती दिली. असे सांगत त्याने गुन्हा कबूल केला.

    तरुणाची दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी, तरी सरकार शांत बसणार नाही : देवेंद्र फडणवीस

    हा गुन्हा करताना आरोपीने कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे राहणार नाही याची दक्षता घेतली होती. अतिशय थंड डोक्याने गुन्हा केला होता. परंतु नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास करुन अल्पावधीतच गुन्हा उघडकीस आणला. आरोपीला अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    रस्त्यात BMW कार पेटलेली, ड्युटीवर नसूनही अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता, देवदुताचं कौतुक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed