• Sat. Sep 21st, 2024

टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव, दोघांचा मृत्यू

टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव, दोघांचा मृत्यू

चंद्रपूर: पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. टेकडीवर फिरत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना तळोधी बाळापूर वनपरिक्षण केंद्र आणि तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोविंदपूर परिसरातील पेरजागड (सेव्हन सिस्टर्स हिल) या टेकडीवर घडली. मृत्यू झालेले पर्यटक नागपूर येथील आहेत.अशोक विभीषण मेंढे (वय-६२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर गुलाबराव पोचे (वय-५८) अशी मृतकांची नावे आहेत. जखमी असलेल्यांमध्ये सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.चंद्रपूर जिल्हा घनदाट जंगलाने व्यापाला आहे. येथील वाघ बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक चंद्रपूरला येतात. नागपूर येथील काही पर्यटक नागभीड तालुक्यातील गोविंदपूर परिसरातील पेरजागड (सेव्हन सिस्टर्स हिल) या टेकडीवर गेले होते. टेकडी फिरताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्याने पर्यटक बिथरले. शेकडो मधमाशांनी त्यांचा चावा घेतला.

प्रेमसंबंध तोडले तर फोटो व्हायरल करेन, तरुणाची धमकी अन् १७ वर्षाच्या मुलीनं आयुष्य संपवलं, ११ दिवसांनी…
या हल्ल्यात नागपूरचे रहिवासी अशोक विभीषण मेंढे (वय-६२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गुलाबराव पोचे (वय-५८) हे गंभीररित्या जखमी झाले होते होते. जखमी अवस्थेत त्यांना डोंगर संकुलातून गंभीर अवस्थेत उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, मार्गतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची उशिराने वनविभागाला माहिती मिळली. वन विभागाचे पथक आणि अग्निशमन दलाच्या दोन वाहने, नागभीड पोलीस आणि स्वाब नेचर केअर संस्थेचे पदाधिकारी यांनी घटनास्थळ गाठले.

शिर्डीतील रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स पाळणा अचानक तुटला; पाच जण गंभीर जखमी, चालकाचा हलगर्जीपणा

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बेपत्ता असलेल्या गुलाबराव पोचे यांचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यांना शोधण्यास यश मिळालं. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत डोंगरावरून खाली रुग्णवाहिकेत नेले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पुढील तपास तळोधी पोलीस आणि तळोधी वनविभाग करीत आहेत.

वाघानंतर मधमाशांची दहशत

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष वाढलेला आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेकांच्या जीव गेलेला आहे. मधमाशांच्या हल्ल्यात दोघांच्या मृत्यू झाल्यामुळे आता मधमाशांची दहशत पर्यटकात वाढली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली. चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटनासाठी देश विदेशातील मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या घटनेने पर्यटकात दहशत पसरली आहे.

सकाळी तरुण पोलीस ठाण्यात आला, म्हणाला – पत्नी आणि मुलाला मारलं, मृतदेह घरात पडले आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed