• Sat. Sep 21st, 2024

करोना काळात संधी साधली; गावकऱ्यांना सोबत घेत अभियान राबवले, गावाला मिळाले ३० लाख

करोना काळात संधी साधली; गावकऱ्यांना सोबत घेत अभियान राबवले, गावाला मिळाले ३० लाख

परभणी: गाव करी ते राव न करी ? या म्हणीला साजेस काम संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन अंतर्गत माझं गाव माझं तीर्थ या अभियानातुन घडलंय. गावकऱ्यांची व्रजमुठ बांधीत करोनाकाळात संकल्प स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पडेगाव नावारूपास आलंय. आर. आर. आबा सुंदर गाव स्पर्धेत तालुका व जिल्हा स्तरातून पडेगावने ३० लाख रुपयांचा प्रथम क्रमांक मिळवलाय. यामुळे गावकऱ्यांना आता ग्राम सुधारणेच्या कामात आणखीन हुरूप आलाय.गंगाखेड तालुक्यातील माळरानावर वसलेल पडेगाव आज सुंदर आणि सुविधायुक्त गाव झालं आहे. गावातील होतकरू शिक्षक श्याम सुंदर निरस यांच्या संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशनअंतर्गत माझं गाव माझं तीर्थ या अभियानाच्या माध्यमातून ग्राम सुधारणेची शपथच गावकऱ्यांनी घेतलीय. त्यातूनच लोकसहभागाच्या बळावर गावात अनेक कामे सुरू झाली, वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनाच्या कामापासून ही चळवळ गावात सुरू झाली, या खडकाळ जमिनीत २ हजार वृक्ष लावले आणि जगवले, आरोग्याच्या हेतूने हागणदारीयुक्त गाव हे अभियान राबविण्यात आले गावात विशेषता महिलांसाठी सार्वजनिक शौचालये उभारली.

१८८५ पासून घरात मुलीच जन्मल्या नाहीत, १३८ वर्षांनी लक्ष्मी आली, अशी होती कुटुंबाची रिअॅक्शन
स्मशानभूमित वृक्ष लागवड, आसनव्यवस्था केली, गावातील तळ्याचे खोलीकरण करून पाइपलाईनद्वारे त्यात पाणी साठविले जात असल्याने गाव दुष्काळमुक्त झाले. निराधारांना आधार म्हणून त्यांना जगण्यासाठी उदरनिर्वाहाचे साधने देऊन त्यांना स्वावलंबी बनवले. शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करुन लोकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम घडवून आणला.

शेती विषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून फळबागा लावण्यास शेतकर्यांना प्रेरित केल्याने शेतकऱ्याचा जीवनात आर्थिक स्थैर्य आले. ग्रामपंचायतीने घंटागाडीच्या माध्यमातून कचर्‍याचे व्यवस्थापन केले. गावात पेव्हर ब्लॉकअंतर्गत रोड बनविणे, रोड बनविण्याचे कामे सुरू आहेत,
या कामात परभणी जिल्ह्यातील अनेक समाजशील हाताच्या मोठा वाटा आहे.

मोठी बातमी! अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये १ टक्के आरक्षण, महाराष्ट्र सरकारचा निर्णय
पडेगावचे सरपंच गंगासागर बोबडे ग्रामविकास अधिकारी उद्धव खुपसे यांनी गावात सुरू झालेल्या युवकांच्या चळवळीला अचूक हेरल्याने हे अभियान यशस्वी झाले. शासनाच्या आर.आर.आबा सुंदर गाव स्पर्धेत पडेगाव जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रथम आल्याने गावाला ३० लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. या पैश्यातून आणि शासनाच्या विविध योजनांमधून गावात अभ्यासकेसह विविध विकास कामे केली जाणार आहेत.

साडे तीन लाख पुऱ्या, १ हजार किलो कांद्याची चटणी; हनुमान जन्मोत्सवानिमित्त पुणेकरांसाठी महाप्रसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed