• Mon. Mar 16th, 2026
    स्ट्राँग बनण्याचं नाटक आता होणार नाही, बाय… २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आयुष्य संपवलं

    जळगाव : मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, अशी इंग्रजीतून सुसाईड नोट लिहित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. आयुष निलेश राठोड (वय २१ वर्ष, गंगाराम प्लॉट) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सुसाईड जप्त केली आहे, या प्रकरणी भुसावळ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भुसावळ शहरातील म्युन्सिपल हायस्कूलच्या मागे गंगाराम प्लॉट येथे आयुष हा आई , वडील, भाऊ या परिवारासह वास्तव्यास होता. आयुष हा पुणे येथे सीएस (कंपनी सेक्रेटरी) शिक्षण घेत आहे. तो नुकताच भुसावळ येथे घरी आला होता. मंगळवारी सकाळी दहा वाजले तरी आयुष हा झोपेतून उठला नाही, म्हणून त्याची आई त्याला उठविण्यासाठी गेला, आवाज दिला, मात्र त्यानंतर कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने आयुष याच्या भावाने आयुषच्या खोलीच्या खिडकीच्या काचा फोडल्या. पडदा बाजूला करुन बघितल्यावर आयुष हा छताला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे दृश्य पाहून आयुषच्या आईसह भावाला मोठा धक्काच बसला. त्यांनी जागेवरच हंबरडा फोडला.

    घटनेची माहिती मिळाल्यावर बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह रुग्णालयात हलविला. या प्रकरणी राकेश राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश चौधरी हे करीत आहेत. आयुषवर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    तुझ्या भावाची बॉडी विहिरीत तरंगताना दिसतेय, दादाला फोन; पुण्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू
    आयुष हा भुसावळ वकील संघातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. पुखराज राठोड यांचा नातू व ॲड. निलेश राठोड याचा लहान मुलगा होता. या दुर्दैवी घटनेने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुषने अचानक टोकाच पाऊल उचलल्याने त्याच्या मित्र परिवारालाही मोठा धक्का बसला आहे.

    ठाण्यात गुंडगिरी चालू, महिलांना मारायची दिघेंची, बाळासाहेबांची शिकवण नाही | रोशनी शिंदे

    स्ट्राँग बनण्याचे नाटक आता होणार नाही….बाय..

    मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्यापूर्वी रात्री अडीच वाजताच्या सुमारास आयुषने त्याच्या आईला आणि मोठ्या भावाला फोन केला, पिण्यासाठी पाणी आणून देऊ का? अशी विचारणा केली, यावेळी आयुषला तू अजून झोपला नाहीस का? अशी विचारणा त्याच्या भावाने केली. त्यावर आयुषने झोपतोच असे सांगत फोन ठेवला. मात्र आयुष सकाळी उठलाच नाही, रात्रीत आयुषने जीवन संपविले अन् जगाचा निरोप घेतला.

    मृत्यूपूर्वी आयुषने चिठ्ठी लिहिली होती. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, स्ट्राँग बनण्याचे नाटक आता होणार नाही.. बाय असा आशय चिठ्ठीत नमूद आहे. दरम्यान गेल्या आठवड्यातच आयुषने त्याच्या काकांना पुढील आयुष्याचे नियोजन लिहून दिले होते, त्याला कायद्याचे शिक्षण घ्यायचे होते. अशीही माहिती समोर आली आहे.

    नागपूरला जाताना कार मागून ट्रकवर आदळली, दोन महिला डॉक्टरांसह पित्याचा जागीच मृत्यू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed