• Sat. Sep 21st, 2024

पालकमंत्री उदय सामंत यांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले हा तर प्रत्येक रिक्षावाल्याचा अपमान

पालकमंत्री उदय सामंत यांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले हा तर प्रत्येक रिक्षावाल्याचा अपमान

रत्नागिरी : ‘काल एक महाभाग’ असा उल्लेख करत रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको असं शरद पवार यांनी म्हटले. मात्र त्यानंतर दोन तासांनी अजितदादांनी दम दिल्यावर पलटी मारली. ते म्हणाले हे माझे वक्तव्य आहे. पण हा प्रत्येक रिक्षावाल्याचा आणि रिक्षावाल्याच्या कुटुंबाचा अपमान आहे त्यामुळे मी कालही आवाहन केलं की एखादयाच्या व्यवसायावरून बदनामी करणे योग्य नाही अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत बोलत होते. उदय सामंत म्हणाले की, ‘आणि फक्त मुख्यमंत्री होण्याचा अधिकार हा ज्याला तोंडात सोन्याचा चमचा ठेवला आहे त्यालाच आहे असं नाही. एखादा रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर, सर्वसामान्य शेतकरी सुद्धा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे स्वतः एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिल आहे. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी बसलेल्या धक्क्यातून अजून कोणीही सावरलेले नसल्यामुळे आजही प्रत्येकाला वाटतं मी उद्या किंवा परवा मुख्यमंत्री होईल. ते सगळं आठ महिन्यांपूर्वीच गेलेल आहे आणि म्हणून कोणी अशी भाषा करायची?’.

संजय राऊत यांनाही लगावला टोला

दररोज सकाळी साडेनऊची असलेली भाषा आम्ही समजू शकतो असाही टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला. पण आता उद्धव ठाकरे ही जर का अशी भाषा करायला लागले तर ती लोकशाहीला धरून नाही असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केल.

तुुझे पैसे देत नाही जा; धमकी, शिवीगाळ करत आडत व्यापाऱ्यांनी कांदा व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडवले
आठ महिन्यांच्या आधी गेली अडीच वर्ष आमची केवळ फेसबुक लाईव्ह वरती गेली आहेत जे काही करायचं ते फेसबुक वरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेमध्ये मिसळून जनतेची कामे करतायत. ते लोकांमध्ये मिसळतात, लोकांची कामे करतात त्याच पद्धतीने देवेंद्रजी काम करत आहेत आणि म्हणूनच जो काही सपोर्ट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मिळत आहे तो काही लोकांना नको आहे आणि म्हणूनच आता उद्धव ठाकरे टीका करत आहेत हे योग्य नाही, असेही सामंत म्हणाले.

शेतकऱ्याने मुलाला कामासाठी तालुक्याला पाठवले, मनात होते वेगळेच, जे केले ते पाहून बसला धक्का
या सगळया आश्चर्याच्या गोष्टी आहेत ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये एकत्र होतो त्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा मुख्यमंत्री हा देशात कधीही झाला नाही असं भाषण आम्ही ऐकलेल आहे. एकनाथ शिंदे ज्यावेळेला मागच्या अडीच वर्षांमध्ये सरकारमध्ये होते त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासारखा मास लीडर महाराष्ट्रात होऊ शकत नाही असं उद्धवजी यांनीच म्हटलं होतं. त्यामुळे एकनाथजींना गुंड म्हणणे देवेंद्रजींना फडतूस म्हणण हे योग्य नाही, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी फटकारले आहे.
बीडच्या तरुणाची संघर्षगाथा, गायक होण्याचं स्वप्न भंगलं, आता बर्फगोळा विकून कमावले नाव, पैसा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed