साताऱ्यात असा असतो माऊलींच्या पालखीचा मार्ग
पुणे जिल्ह्यातून पालखी सोहळा नीरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यात दाखल होतो. माऊलींच्या पालखीचं नीरा स्नान आणि आरती होते. त्यानंतर सातारा जिल्ह्यात ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होते. यानंतर पालखी सोहळा रात्री लोणंद येथे हा सोहळा मुक्कामी असतो.
राम जन्मला गं सखे…. राम नामानं दुमदुमलं काळाराम मंदिर
लोणंद येथील मुक्कामानंतर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान तरडगाव (ता. फलटण) येथे होते. तिथं पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. साताऱ्यातील एकमेव असं पहिलं उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे पार पडतं. यानंतर माऊलींचा पालखी सोहळा फलटणकडे प्रस्थान करतो. वाटेत सुरवडी, निंभोरे, वडजल येथे विसाव्यासाठी पालखी काही वेळ थांबतो. त्यानंतर सायंकाळी सोहळा पालखी फलटण विमानतळावर मुक्कामी असतो. यानंतर पालखी सोहळा बरडनंतर पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो.
पालखी सोहळा सुरु होणार असल्याची तारीख समजल्यानं दिंडी चालक-मालक यांची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. माउलींचा पालखी सोहळा यावर्षी मोठा होणार असल्याचा अंदाज आहे. यंदा मोठ्या संख्येनं वारकरी वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात नीरा स्नानानंतर पालखीचे आगमन होते, तर बरडच्या सीमेवर धर्मपुरीजवळ पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो. पायी वारी सोहळ्याने भाविकांसाठी एक नवे चैतन्य निर्माण होते. अनेक वारकरी या सोहळ्यात सामील होण्यासाठी तयारी करू लागले आहेत.