उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपल्या पक्षातील तालुकाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांना 14 बुलेरो गाड्या देणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी या गाड्या दिल्या जाणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिनसेना पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. पक्षवाड आणि ग्रामीण भागातील संपर्क वाढवण्यासाठी तालुकाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना 14 नव्या बोलेरो गाड्या दिल्या जाणार आहेत. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या वाहनांचे वाटप होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आणि आमदार सुहास कांदे यांनी दिली.
तालुक्याप्रमुख आणि इतर कार्यकर्त्यांना गाड्या का देणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने या 14 गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी, गावोगावी दौरे करण्यासाठी आणि कार्यकत्यांशी संपर्क वाढवण्यासाठी या वाहनांचा वापर केला जाणार आहे. या गाड्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
Maharashtra Rain : अचानक वातावरणात बदल होणार, यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज
वाहनांच्या वापराचा अहवाल घेतला जाणार
‘शिवसेना आपल्या दारी’ या अभियानांतर्गत पदाधिकारी गावागावांत संपर्क साधणार आहेत. तालुकाध्यक्षांवर घरोघरी पक्ष पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, वाहनांच्या वापराचा दैनंदिन अहवालही घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पक्षाने वाहन सुविधा उपलब्ध करून दिल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बुथप्रमुखांपासून तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाचा प्रचार-प्रसार वाढवण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिवसेना संपर्कप्रमुखांची प्रतिक्रिया
जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवण्यासाठी 14 वाहने दिली जात आहेत. बूथप्रमुखांपासून तालुकास्तरावरील कार्यकर्ते या गाड्यांचा वापर करून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत. पुढील आठवड्यात या वाहनांचे वाटप केले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना संपर्कप्रमुखांनी दिली आहे.
Satara News : संचालकांना थेट चप्पला आणि लाडू फेकून मारलेले, सह्याद्री कारखान्यातील 28 वर्षांपूर्वीची घटना चर्चेत
संघटनात्मक पक्षवाढ महत्त्वाची
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी पक्षाची संघटनात्मक वाढ ही महत्त्वाची असणार आहे. कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यासोबतच 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी पक्षाची संघटना मजबूत करणं महत्त्वाचं आहे. शिंदेंची शिवसेना पक्षात असली तरी महायुतीमधील अंतर्गत राजकारण, मतभेद या पाहता स्वपक्षाचं सामर्थ्य बळकट करणं हा पक्षापुढील महत्त्वाचा पर्याय आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना पक्षवाढीसाठी वाहनांची सुविधा करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा