श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि विविध आस्थापनांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. खंडणीखोरीविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्यात आले असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना कोणतीही सहानुभूती अथवा सहनशीलता दाखवली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विणयकुमार चौबे यांनी दिला आहे. एमआयडीसी भोसरी परिसरातील एका खासगी कंपनीच्या व्यक्तीला धमकावून तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्यापैकी २५ लाख रुपये स्वीकारणाऱ्या चार आरोपींना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करून खंडणी वसूल करणाऱ्यांना पोलिसांनी मोठा दणका दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एम.आय.डी.सी परिसरातील एका खासगी कंपनीच्या व्यक्तीला आरोपींनी कंपनीची कागदपत्रे काढल्याचे सांगत धमकावले. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर खंडणीच्या रकमेपैकी २५ लाख रुपये स्वीकारण्यासाठी आरोपी आले असता पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय ३८), अल्ताफ उस्मान जानवेकर (वय ४३), रमेश भिमा मांजरेकर (वय ३९) आणि सुनील राजेंद्र कानू (वय ३४) यांचा समावेश आहे. यातील आरोपी सुनील कानू याच्या ताब्यातील चारचाकी वाहनातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर खंडणीच्या रकमेबाबत अधिक तपास करण्यात आला. या प्रकरणातील इतर आरोपींची भूमिका तसेच खंडणीच्या कटामागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
“औद्योगिक क्षेत्रात खंडणीखोरीला थारा नाही”
औद्योगिक परिसरातील कोणत्याही उद्योजक, व्यावसायिक किंवा आस्थापनावर दबाव आणून पैसे मागणे, धमकी देणे, जबरदस्ती करणे, दहशत निर्माण करणे अथवा गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणे कदापि सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
“औद्योगिक विकासाला अडथळा आणणारी कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. उद्योजक आणि व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा धमकीला बळी न पडता अशा घटनांची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी,” असे पिंपरी- चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
खंडणीची मागणी झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा
खंडणीसंदर्भात कोणत्याही प्रकारची धमकी, दबाव किंवा पैशांची मागणी झाल्यास नागरिकांनी आणि उद्योजकांनी घाबरून न जाता तात्काळ खंडणीविरोधी पथक किंवा गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखा हेल्पलाईन : ७५१७-७५१७-५९३
पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शिवाजीकुमार महादेवकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहित पवार यांनी केले. कारवाईत खंडणीविरोधी पथक, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा