• Thu. Sep 3rd, 2026

Thane Municipal Corporation:शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये गणवेश वाटप झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात अथवा साध्या कपड्यात शाळेत जावं लागत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा, ठाणे: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले, तरी ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश मिळालेला नाही. दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य देण्याची घोषणा केली जाते.

जुना गणवेश , साध्या कपड्यांमध्ये विद्यार्थी शाळेत

मात्र, यंदा निविदा प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी असून, विद्यार्थ्यांवर जुना गणवेश किंवा साध्या कपड्यांमध्ये शाळेत जाण्याची वेळ आली आहे.

खरेदीची प्रक्रिया उशीरा

ठाणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे २८ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना दरवर्षी महापालिकेकडून मोफत गणवेश दिला जातो. यंदा गणवेश खरेदीची निविदा प्रक्रिया उशिरा पूर्ण झाल्याने त्याचा थेट परिणाम वितरणावर झाला आहे.

१५ ऑगस्टला देखील जुन्या गणवेशात विद्यार्थी

काही विद्यार्थ्यांचे जुने गणवेश लहान झाले असून, तरीही त्याच गणवेशात शाळेत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमातही अनेक विद्यार्थी जुन्याच गणवेशात दिसून आले. शाळेतील महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या दिवशीही विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाला नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.

Maharashtra TimesMaratha Reservation: ओबीसी कोटा 27 ऐवजी 37 टक्क्यांपर्यंत का वाढवला नाही? मराठा आरक्षण प्रकरणी हायकोर्टाचा प्रश्न

पुढील आठवड्यात गणवेश वाटप

दरम्यान, गणवेश खरेदीची कार्यादेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप सुरू होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष वाटप कधी पूर्ण होते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra TimesThane News : ठाण्याच्या गोविंदा पथकांचा मुंबईत बोलबाला ; सरावातच सलग तिसऱ्यांदा रचले नऊ थर

विलंबाचा फटका

दरवर्षी नियोजित वेळेत गणवेशाचे वितरण करण्यासाठी खरेदी प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, यंदा झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. आगामी काळात अशा प्रकारचा विलंब टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा