Mumbai Bhuleshwarcha Raja Two People Death : मुंबईतल्या भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
मंडळाच्या अध्यक्षाचा मृत्यू
भुलेश्वरच्या राजाची ही मिरवणूक भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेनं निघाली होती. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडप अवघ्या 50-60 मीटर अंतरावर बाप्पाची मूर्ती आली होती. याचदरम्यान 22 फूट मूर्तीचा तोल गेला. त्याखाली मंडळातील काही कार्यकर्ते दबले गेले. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. मृत व्यक्तींची नावे संकेत नेवशे (वय 33) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय 30) अशी आहेत. या दोघांना रुग्णालयात आणलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. जखमी झालेल्या पाच जणांमध्ये 5 आणि 7 वर्षे वयाच्या दोन मुलींचा समावेश होता. जखमींवर जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हृदयद्रावक बाब म्हणजे, या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचा मृत्यू झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar : लेकरासह आई-वडिलांचीही एक्झिट, पण चांदगुडेंच्या घरातून ‘तो’ एक आवाज सतत सुरु; ऐकून शेजारच्यांचा ठोका चुकला
नेमकं काय घडलं?, अपघाताचं कारण काय?
गणपतीचं मोठं उत्साहात आगमन सुरु होतं. गणपती बाप्पा भुलेश्वर परिसरात आला होता. पहिले गणपतीच्या गळ्यातील हार पडला. त्यानंतर मूर्ती हलायला लागली. ‘खड्ड्यांमुळे सगळं झालं’, अशी प्रतिक्रिया तिथल्या नागरिकांनी दिली. ‘खड्ड्यात ट्रॉलिचं चाक अडकलं, त्यानंतर झटका बसला’, अशी माहितीही नागरिकांनी दिली.
लालबागच्या उड्डाणपुलावर ‘ग्रीन कव्हर’ची खबरदारी
गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होत असून, दर शनिवार-रविवारी मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्यावेळी लालबाग-परळ परिसरात मोठी गर्दी होत आहे. उत्सवाच्या दहा दिवसांत आणि विसर्जनावेळी ही गर्दी टिपेला पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर, अपघात टाळण्यासह गर्दीला शिस्त लावण्यासाठी मुंबई महापालिका, पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. लालबाग उड्डाणपुलावर एका बाजूला बॅरिकेड लावून त्यावर उंच हिरवे पडदे, म्हणजेच ‘ग्रीन कव्हर’ बसवण्यात आले आहे. त्यामुळे पुलावर उभे राहून किंवा वाकून पाहणाऱ्यांना आळा बसेल. परळ वर्कशॉपसमोरील रस्तेदुभाजकांवरही अशाच पद्धतीने बॅरिकेड आणि हिरवे पडदे बसवले आहेत.
Prashant Kishor: पार्थ पवारांच्या घरी हाय व्होल्टेज बैठक, प्रशांत किशोर यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडे बोल, दिग्गज नेत्यांमध्ये नाराजीचा सूर?
धक्काबुक्कीची किंवा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या आगमनाची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. गणेशमूर्ती नेण्यासाठी लालबाग-परळ भागातील मोठ्या मूर्तिशाळांबाहेर शनिवार-रविवारी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांची मोठी गर्दी होत आहे. लालबाग-परळ वर्कशॉप, आयटीसी हॉटेल परिसर, भारतमाता, चिंचपोकळी आदी भागांतून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती आगमनासाठी रवाना होतात. आगमन सोहळा पाहण्यासाठी उत्साही गणेशभक्तही मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे या परिसरातील रस्ते गर्दीने फुलून जातात.
विसर्जनावेळी तर हीच गर्दी लाखांवर जाते. त्यामुळे गर्दीवेळी लालबाग उड्डाणपुलावरून आगमन-विसर्जन सोहळा पाहण्यासाठी अनेक जण थांबतात. काही जण पुलावरून वाकून पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे धक्काबुक्कीची किंवा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पुलावर बॅरिकेड आणि हिरवे पडदे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पुलावरून उभे राहून सोहळा पाहण्यावर मर्यादा येणार असून, अपघाताचा धोका कमी होणार आहे.
Khavdya Dongar : कुणालची आई युट्युबर, व्हिडिओतून दिली महत्त्वाची माहिती; खवड्या डोंगर प्रकरणात कौटुंबिक वादाचा नवा अँगल
अतिउत्साही गर्दीला शिस्त लागण्यास मदत
परळ वर्कशॉप ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गापर्यंतच्या रस्तेदुभाजकांवरही बॅरिकेड आणि उंच हिरवे पडदे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे दुभाजकांवर कोणीही उभे राहू शकणार नाही. तसेच गर्दीवेळी धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडण्यालाही आळा बसेल. या उपाययोजनांमुळे अतिउत्साही गर्दीला शिस्त लागण्यास मदत होईल.
