• Sat. Jul 18th, 2026

    Delimitation Bill: …तर आम्ही 24 तासांत भूमिका मांडू! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

    Delimitation Bill: …तर आम्ही 24 तासांत भूमिका मांडू! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

    Supriya Sule On Delimitation Bill: संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.

    सुप्रिया सुळे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. विधेयकाबाबत राष्ट्रवादी ‘शप’ पक्ष किंवा महाविकास आघाडीसमोर कोणतेही लेखी प्रस्ताव आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही त्याबाबत बोलू शकत नाही. पण तसा प्रस्ताव आला तर आम्ही २४ तासांत भूमिका मांडू, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मांडली.

    मंगळवारी रात्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतल्याने त्यात भर पडली. मात्र, या विषयी पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही, असे केले.

    Maharashtra TimesDevendra Fadnavis: शेतकऱ्यांना ‘दुबार’ दिलासा! कर्जमाफीपाठोपाठ 48 हजार कोटींच्या वीजबिलमाफीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
    खासदार सुळे म्हणाल्या की, महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत एकमताने मंजूर झाले. त्यानंतर मतदारसंघ विधेयकासाठी पुनर्रचनेच्या संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांनी मला, शिवसेना ‘उबाठा’ पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. लोकसंख्येच्या आधारित मतदारसंघ पुनर्रचना झाली तर अन्याय होईल, असे दक्षिणेतील राज्यांना वाटत आहे. त्यामुळे या विधेयकाला आमचा विरोध असल्याचे दक्षिणेतील राज्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेचे सूत्र बदलता येईल का, असे आम्ही विचारले होते.

    त्यावर सरसकट काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यात ५० टक्के जागा वाढवल्या जातील, असा प्रस्ताव रिजिजू यांनी ठेवला. संसदेत महाराष्ट्राच्या ४८ जागा आहेत. त्यामध्ये ५० टक्के वाढवल्या, तर २४ जागा वाढतील. म्हणजेच महाराष्ट्रातून संसदेत ७२ जागा निवडून जातील. ७२ खासदारांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या समाजाला तीन जागा द्याव्या लागतील. महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन ४८ जागा खुल्या प्रवर्गासाठी जातील.’

    Maharashtra TimesMumbai News: मुंबई सर्वांत स्वच्छ का नाही? उच्च न्यायालयाचा प्रश्न; उपाय योजण्याचे महापालिकेला निर्देश
    सरसकट ५० टक्के वाढीला विरोध नाही
    सुळे म्हणाल्या की, ‘अशाप्रकारे सरसकट ५० टक्के वाढ होणार असेल तर कोणाचाही विरोध नाही, ही नवी तरतूद आम्हाला जास्त योग्य वाटली. याप्रमाणे नवे विधेयक येणार असेल तर आम्ही ‘इंडिया’ आघाडीत याबाबत चर्चा करून पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ. पण सरकारने प्रत्येक पक्षाला वेगवेगळे विचारण्यापेक्षा एकत्र विचारायला हवे. यासाठी ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला पत्र लिहून हा प्रस्ताव योग्य असल्याचे स्पष्ट करत ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून यावर विचार करायला हरकत नाही, असे सांगितले. मात्र, त्यानंतर सरकारने जे विधेयक आणले त्यात कुठेही ५० टक्क्यांचा उल्लेख नसल्याने आम्हाला धक्का बसला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा