Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर दहा १२ डब्यांच्या लोकल फेऱ्यांचं रुपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये होणार आहे. सोमवार, २० जुलैपासून या लोकल सीएसएमटी ते कल्याण, कर्जत आणि कर्जत-सीएसएमटी मार्गावर धावणार आहेत.
सध्या मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या २२ आहे. सोमवारपासून ही संख्या ३२ होणार आहे. परंतु, यासाठी कोणत्याही नव्या लोकल फेऱ्या वाढवण्यात येत नाही आहेत असंही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दहा १२ डब्यांच्या लोकलला तीन डबे जोडून त्यांचं रुपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी करत आहेत. पण मध्य रेल्वेच्या मार्गावरी स्थानकांमध्ये फलाट विस्ताराचं काम शिल्लक असल्यामुळे हे लांबलं गेलं. अजूनही अनेक स्थानकांवरील फलाट विस्ताराचं काम अपूर्ण असल्यामुळे केवळ दहा फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हळूहळू गर्दीच्या सर्व स्थानकांवर १५ डब्यांच्या लोकल धावतील.
Mumbai Local: रेल्वे प्रकल्पांना अतिक्रमणांचा ‘थांबा’; कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गिका रखडली
या दहा लोकलमध्ये अप मार्गावर पाच आणि डाऊन मार्गावर पाच लोकल असतील. या मार्गांवरील पूर्वीच्या १२ डब्यांच्या लोकल फेऱ्यांचं रुपांतरच १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. वेळापत्रक जाणून घ्या-
डाऊन मार्गावर या लोकल १५ डब्यांच्या म्हणून चालतील:
सकाळी ९.१५ची सीएसएमटी ते अंबरनाथ लोकल
दुपारी १२.२६ ची (सध्या १२.१७ ला सुटणारी) सीएसएमटी ते कल्याण लोकल
दुपारी ३.०३ ची सीएसएमटी ते बदलापूर लोकल
सायंकाळी ६.२१ ची सीएसएमटी ते कर्जत लोकल
रात्री ११.०८ची सीएसएमटी ते अंबरनाथ लोकल
अप मार्गावर या लोकल १५ डब्यांच्या म्हणून चालतील:
सकाळी ७.५१ ची अंबरनाथ ते सीएसएमटी लोकल
सकाळी ११.०३ ची अंबरनाथ ते सीएसएमटी लोकल (या धीम्या लोकलला जलद लोकल म्हणून चालवलं जाईल)
दुपारी १.३० ची कल्याण सीएसएमटी लोकल
सायंकाळी ४.४७ची बदलापूर ते सीएसएमटी लोकल
रात्री ८.३८ ची कर्जत ते सीएसएमटी लोकल
Kandivali Railway Terminus: मुंबईतील सर्वात मोठं रेल्वे टर्मिनस उभारण्याची तयारी, कांदिवलीमध्ये जमीन निश्चित; प्रकल्पासमोर एक अडथळा
गर्दीच्या वेळेत दोन मुख्य सेवा असतील. यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कर्जत-अंबरनाथ जलद लोकलमध्ये गर्दीच्या वेळी प्रवासी अक्षरश: दरवाज्यावर लटकून प्रवास करतात. यामुळे अनेक अपघात होतात. मध्य रेल्वने हे स्पष्ट केलं आहे की कोणत्याही नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात येत नाही आहेत. सध्या रेल्वे मार्गावर धावत असलेल्या १२ डब्यांच्या लोकलचं १५ डब्यांच्या म्हणून चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सध्याच्या वेळापत्रकात काहीही बदल होणार नाही आहे. या १५ डब्यांच्या लोकल यापूर्वी ठरेलेल्या वेळेवरच धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर ठाणे- कल्याण आणि कल्याण ते बदलापूर पट्ट्यात प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचं काम करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, सर्व स्थानकांवर १५ डब्यांच्या लोकलला थांबे देण्यासाठी फलाट विस्ताराच्या कांमांना वेग देण्याच्या मागण्या केल्या जात आहेत. तुमच्या मते रेल्वेने अजून कोणत्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवल्या पाहिजेत, कमेंटमध्ये सांगा
