Maharashtra ATS Raid : पाकिस्तानी टोळीशी संपर्क; विदर्भातील 10 युवक एटीएसच्या ताब्यात, पाच जिल्ह्यांत मोठी कारवाई
पाकिस्तानातील कुख्यात गुन्हेगारी टोळीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क ठेवल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी राज्यभरात मोठी कारवाई केली. या कारवाईत विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि वर्धा या पाच जिल्ह्यांतील दहा युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
