• Fri. Jul 10th, 2026
    Maharashtra Rain Alert : पुढील 5 दिवस राज्यातलं हवामान कसं? पावसाची क्षणभर विश्रांती की धुमाकूळ? ‘या’ गोष्टीचा परिणाम दिसणार

    जितेंद्र खापरे, नागपूर: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता कमी होण्याची शक्यता असून, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात पावसाला विश्रांती मिळणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कोणताही कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची चिन्हे नसल्याने राज्यात व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी सांगितले.

    डॉ. प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण घटेल. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात, मात्र राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता सध्या दिसत नाही. हवामान विभागाकडून पाच ते सहा दिवसांचा अंदाज जारी केला जात असून, त्यानुसार काही जिल्ह्यांना पुढील काळात यलो अलर्ट देण्यात येणार आहे. मात्र, राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.

    Tukaram Mundhe FDA Action : 72 तास, 5 शहरं आणि 90.42 लाखांचा साठा; मुंढेंच्या FDAनं आरोग्याशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश केला, नेमकं काय-काय जप्त?

    सध्या बंगालच्या उपसागरात कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्यामुळे पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील. विशेषतः विदर्भात पावसाचे प्रमाण घटल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

    मुंबई, पुणे, कोकणासारख्या भागांमध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस होत असला, तरी विदर्भात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत विदर्भात सरासरीपेक्षा सुमारे १६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सुरुवातीच्या काळात काही भागांत समाधानकारक पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पर्जन्यमानात तूट निर्माण झाली आहे.

    Maharashtra TimesNanded News : पहाटे क्लासच्या आवारात दिसलं भयानक दृश्य, नांदेडमधील जाधव सरांसोबत नेमकं काय घडलं?

    हवामान विभागाने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी अद्ययावत हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार असला, तरी स्थानिक हवामानातील बदलांमुळे काही भागांत तुरळक सरींची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हवामान विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणारे इशारे आणि अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांनंतर बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली तयार झाल्यास राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed