• Tue. Jul 7th, 2026
    Mumbai Weather Alert: मुंबईकरांना दिलासा मिळणार; पावसाचा जोर ओसरणार, हवामान खात्याचा ताजा अंदाज

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जुलैच्या सुरुवातीपासून मुंबईमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारनंतर थोडा कमी होईल, असा अंदाज आहे. मुंबईमध्ये सोमवारी वाऱ्याचा वेग अधिक असण्याची शक्यता असल्याने आधीचा ऑरेंज ॲलर्ट अद्ययावत करून सकाळी रेड ॲलर्ट देण्यात आला. मुंबईमध्ये सोमवारी दिवसभरात कुलाबा येथे ३९.२, तर सांताक्रूझ येथे ६९.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

    मान्सूनचे वारे सध्या सक्रिय आहेत. तसेच झारखंड आणि जवळच्या ओडिशावर सक्रिय असलेला तीव्र कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेने सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर याचा परिणाम झाला असून वाऱ्यांचा वेग वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हे क्षेत्र मंगळवारपर्यंत नाशिकच्या दिशेने सरकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेच नाशिक घाट परिसराला मंगळवारसाठी रेड ॲलर्ट देण्यात आला. पालघर, रायगड येथे मंगळवारीही रेड ॲलर्ट देण्यात आला. मुंबई आणि ठाण्याला मंगळवारी ऑरेंज ॲलर्ट आहे.

    लोकलसेवा विस्कळीत

    मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका पश्चिम आणि मध्य रेल्वेसेवेलाही बसला. वसई-विरारदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सोमवारी या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. तर, गुरु तेग बहादूर (जीटीबी ) नगर ते वडाळा येथील राऊळी जंक्शनदरम्यान रुळांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सीएसएमटी ते कर्जत, कसारा आणि चर्चगेट ते वसईदरम्यान सोमवारी लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली.

    हार्बरवरील जीटीबी नगर ते राऊळी जंक्शनदरम्यान रेल्वे मार्गावर दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास फांदी कोसळली. त्यामुळे रेल्वेवाहतूक बंद करण्यात आली. दुपारी ३. १० वाजता रुळांवरून फांदी हटवल्यानंतर सीएसएमटी ते पनवेलदरम्यान लोकल वाहतूक पूर्ववत झाली. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत आणि कसारा मार्गावरील लोकल विलंबाने धावल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

    ओव्हरहेड वायरवर प्लास्टिक

    पावसाचे पाणी रोखण्यासाठी घराच्या छतावर टाकण्यात येणारे प्लास्टिक वाऱ्याने उडून भांडुप स्थानक परिसरात ओव्हरहेड वायरवर आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ११.४० वाजता घडलेल्या या घटनेनंतर वाहतूक अर्धा तास विस्कळीत होती.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed