• Sun. Jul 5th, 2026
    Navnath Ban: रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! उद्धव ठाकरेंना नवनाथ बन यांचा टोला

    Navnath Ban On Uddhav Thackeray: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे होऊ शकले नाहीत, ते रामचंद्रांचे काय होणार?’ अशी टीका बन यांनी केली.

    नवनाथ बन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी साधुसंतांसह देशभरातील दिग्गज उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून होते. प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे त्यांना वाटले नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसची त्यांना भीती होती. आता जनाधार गमावल्यानंतर रामरक्षा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पक्षरक्षा करावी’, असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी मुंबईत मारला.

    मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘प्रभू रामचंद्र मंदिराच्या आंदोलनाच्या वेळेला भाजप आणि तमाम ‘हिंदू मंदिर वही बनाएंगे’ अशा घोषणा देत होते, तेव्हा हेच उद्धव ठाकरे ‘मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे’ असे म्हणत त्यांची खिल्ली उडवत होते. ही तुमची प्रभू रामचंद्रांची भक्ती आणि ही तुमची रामरक्षा. आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधून तुम्ही प्रभू रामचंद्रांचे विचारही सोडून दिले.

    Maharashtra TimesMumbai Rain : मुंबईतल्या पावसातलं हे दृश्य पाहून अनेकांनी VIDEO रिवाइंड केला; वंदे भारत ट्रेनमुळे नेमकं काय घडलं?
    ‘हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान’
    ‘प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या येथील मंदिरात अपहार करणाऱ्या एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एवढेच काय तर त्या आरोपींना वकीलही मिळू नये यासाठीही सारेजण प्रयत्न करत आहेत. पण, तुम्ही मात्र हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी कारस्थान आखण्याचा प्रयत्न करत आहात’, अशी टीकाही बन यांनी ठाकरे यांच्यावर केली.

    ‘उद्धव ठाकरे यांनी रामाला साकडे घालावे’
    सांगली : ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणारच आहेत, तर त्यांनी मुंबईत रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आपले आमदार फुटू नये म्हणून अयोध्येत श्री रामाला साकडे घालावे,’ असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. मिरजेतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर आलेले आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    Maharashtra TimesMumbai News: साकीनाका मृत्यू प्रकरणात पोलिसांना कंत्राटदार सापडेना; ३ मजूर सापडले, त्यांनाच ताब्यात घेतले!
    आज श्री रामरक्षा घंटानाद
    छत्रपती संभाजीनगर : अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या देणगीमध्ये झालेल्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारी (पाच जुलै) राज्यव्यापी श्री रामरक्षा घंटानाद आयोजिण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरातही घंटानाद करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता सुपारी हनुमान मंदिरात जिल्हाव्यापी घंटानाद व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा