Uday Samant: समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला सामंत यांनी उत्तर दिले.
नि:क्षारीकरण प्रकल्पामुळे मुंबईला अतिरिक्त दोनशे एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर एक हजार लिटर पाण्यासाठी सुमारे ३५ रुपये, म्हणजेच प्रतिलिटर १५ ते १७ पैसे खर्च अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Mumbai News: साकीनाका मृत्यू प्रकरणात पोलिसांना कंत्राटदार सापडेना; ३ मजूर सापडले, त्यांनाच ताब्यात घेतले!
मनोरीतील नि:क्षारीकरण प्रकल्प संयुक्त भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यात येत असून यासाठी मे. जीव्हीपीआर इंजिनीअर्स लिमिटेड आणि मे. आय. डी. ई. टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारी उपक्रमाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र संदर्भातील आवश्यक मान्यता प्राप्त झाली आहे, असेही सामंत म्हणाले.
या प्रकल्पाच्या बांधकामासाठी ४ हजार ७७ कोटी रुपये खर्च होणार असून, त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. कार्यादेशानुसार प्रकल्पाच्या बांधकामाचा कालावधी ४८ महिने असून, त्यानंतर २० वर्षांचा प्रचलन आणि परिचालन कालावधी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली. मनोरी प्रकल्पपाठोपाठ वर्सोव्यातही नि:क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पातूनही समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज दोनशे दशलक्ष पाणी उपलब्ध केले जाणार आहे.
Uddhav Thackeray: अब हिंदू माफ नहीं करेगा! राम मंदिर अपहारप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक, ५ जुलैला दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन
पाच वॉर्डाना पाणी मिळणार
मनोरी प्रकल्प पूर्ण होताच पी उत्तर मालाड, पी दक्षिण गोरेगाव, आर मध्य बोरिवली पश्चिम, आर उत्तर दहिसर आणि आर दक्षिण कांदिवली या वॉडांना या प्रकल्पातून पाणी मिळेल. सध्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई शहर व पश्चिम उपनगरांना पाणीपुरवठा होतो. मनोरीतील प्रकल्प कार्यन्वित होताच, भांडुप संकुलातील या पाच वॉडांच्या वाट्याचे पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे संकुलातील पाणी गरज असेल तेथे वळवता येईल.
