• Sun. Jun 28th, 2026

    Tukaram Mundhe : काळ्या तेलात अन्न तळणाऱ्यांची आता खैर नाही, तुकाराम मुंढेंकडून हॉटेल व्यवसायिकांसाठी ऐतिहासिक आदेश जारी

    Tukaram Mundhe : काळ्या तेलात अन्न तळणाऱ्यांची आता खैर नाही, तुकाराम मुंढेंकडून हॉटेल व्यवसायिकांसाठी ऐतिहासिक आदेश जारी

    तुकाराम मुंढे यांनी हॉटेल व्यवसायिकांसाठी नवे आदेश जारी केले आहेत. या आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करणे संबंधितांना बंधनकारक असणार आहे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी जारी केलेल्या नव्या आदेशाविषयी माहिती दिली. तसेच या आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. “मी 23 जूनला एक आदेश पारित केलेला आहे. हे आदेश हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यासाठी आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट यांनी पाळावायाच्या काही गोष्टी बंधनकारक आहेत. ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

    “आम्ही राबवलेल्या विशेष मोहीम आणि सर्वेक्षणात गंभीर त्रुटी आस्थापनांमध्ये आढळल्या आहेत. जसे की, अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक परिस्थितीत अन्न तयार करणे, वापरलेला खाद्य तेलाचा परत वापर करणे, वैद्यकीय तपासणी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून अन्न पडताळणी करणं, तापमान नियंत्रणात त्रुटी असणं, अन्न दर्जाहीन साहित्यात अन्न पदार्थाचे पॅकेजिंग करणं, ग्राहकांना सुरक्षित पाण्याचे पाणी उपलब्ध न करुण देणे आणि विविध अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे या गंभीर त्रुटी आम्हाला आढळल्या आहेत. या गोष्टी नियमांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा याबाबत आदेश पारित केले आहेत”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

    आदेश कुणाकुणाला लागू होईल?

    “हे आदेश सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला लागू होणार आहे. तसेच उपहारगृह, ढाबे, कँटिन, कॅफेटेरिया, बेकरी, मिठाईचे दुकानं, कॅटरिंग युनिट, फूड कॅटरस, जूस बास, विविध प्रकारचे किचनस, साखळी उपहारगृह, ई कॉमर्स आणि इतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी या सर्वांना हा आदेश लागू होईल. जिथे जेवण बनवलं जातं आणि लोकांना खाद्य म्हणून विकलं जातं तिथे हा कायदा लागू होईल”, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

    तुकाराम मुंढे यांच्याकडून देण्यात आलेले आदेश पुढीलप्रमाणे:

    • लायसन्सशिवाय रेस्टॉरंट आणि हॉटेल चालवता येणार नाही.
    • स्वच्छता आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचं आहे
    • कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षण गरजेचं आहे. कारण त्याला काही आजार असेल तर अन्नातून तो आजार पसरु शकतो
    • कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणं गरजेचं आहे.
    • गरम आणि थंड अन्नासाठी निर्धारित तापमान राखणे गरजेचं आहे.
    • परवानाधारक पुरवठाधारकाकडून कच्चा माल खरेदी करणे
    • ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देणं बंधनकारक आहे. आमच्याकडे पाणी नाही, बाटलीचं विकत पाणी मिळेल, असं बंधनकारक करता येत नाही. त्यावर आम्ही कारवाई करणार आहोत, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
    • वापरलेल्या खाद्य तेलाचा परत वापर करता येणार नाही. तेलचा वास यायला लागला, ते काळं दिसायला लागलं तर ते आरोग्यासाठी घातक असतं.
    • ऑनलाइन विक्री होणाऱ्या अन्न पदार्थावर प्रत्येक ठिकाणी परवाना क्रमांक लागेल. कॅलरीची माहिती द्यावी लागेल. जेवढे किचन असतील त्या प्रत्येक किचनला वेगवेगळी परवानगी घ्यावी लागेल. मोठ्या कंपन्यांनी दरवर्षी किचनचे ऑडिट करणे आवश्यक आहे.
    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा