Pune Crime: २४ वर्षीय केतन अग्रवालचा लोहगडावरुन ३५० फूट खोल दरीत पडून दुर्दैवी शेवट झाला. हे प्रकरण आधी अपघाताचं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात ते घातपाताचं निघालं. केतनच्या होणाऱ्या पत्नीनंच त्याला थंड डोक्यानं शेवट केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: परदेशात शिक्षण घेऊन पुण्यात परतलेल्या २४ वर्षीय केतन अग्रवालची त्याच्याच होणाऱ्या पत्नीनं हत्या केल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. १८ जूनला केतन आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल लोहगडावर गेले होते. तेव्हा सियानं तिचा प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं एका निर्जन कड्यावरुन केतनला ढकललं. ३५० फूट खोल दरीत पडल्यानं केतनचा मृत्यू झाला.
१९ जूनला सियाचा वाढदिवस होता. त्याच्या आदल्या दिवशी सिया आणि केतन लोहगडावर ट्रेकिंगला गेले होते. तेव्हा कड्याजवळ सेल्फी काढताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केतनचा पाय घसरला आणि दरीत पडला, अशी माहिती सियानं पोलिसांना दिली. पण केतन नियमित ट्रेकिंगला जायचा. त्यामुळे तो पाय घसरुन पडणं शक्य नसल्याचं कुटुंबाला वाटत होतं. त्यांच्या मनात शंकेची पाय चुकचुकली. त्यामुळे त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवली.
सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी निर्जन कड्यावरुन केतनला खाली ढकलल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. सिया आणि चेतन लोहगडावर जात असताना चेतननं मागून आला. हुडी घालून त्यानं चेहरा झाकून घेतला. निर्जन कड्यावर आसपास कोणीही नसल्याचं पाहून दोघांनी मिळून केतनला खाली ढकललं. केतनचा दुर्दैवी शेवट झाला.
केतनचा १८ जूनला शेवट झाला. त्याच्या ४ दिवस आधीही सियानं केतनला संपवण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबानं केला आहे. ‘१४ जूनलादेखील केतनला ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्याचा जीव अगदी थोडक्यात वाचला. सियानं केतनला लोहगडाच्या कड्यावरुन ढकललं होतं. पण एका झाडाचा आधार मिळाल्यानं केतन बचावला,’ असा दावा त्याच्या कुटुंबानं केला.
‘सियानं १४ जूनलादेखील लोहगडावरुन केतनला ढकललं होतं. कड्यावर साप पाहिला. तो केतनला दंश करेल याची भीती वाटली. केतनला वाचवण्याच्या हेतूनं त्याला धक्का दिल्याची बतावणी त्यावेळी सियानं केली होती’, असं केतनच्या कुटुंबानं सांगितलं. यानंतर १८ जूनला सिया पुन्हा एकदा केतनला घेऊन किल्ल्यावर गेली. यावेळी तिच्या सोबत तिचा प्रियकर चेतनदेखील होता. तो दोघांपासून सुरक्षित अंतर राखून होता. संधी मिळताच सियानं चेतनच्या साथीनं केतनला खोल दरीत ढकललं.
१४ जूनला घडलेला प्रकार, थोडक्यात वाचलेला जीव यामुळे केतन १८ जूनला सिया सोबत जाण्यास तयार नव्हता. पण सियानं केतनकडे हट्ट धरला. मला तुझ्या सोबत आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायचा आहे, असं म्हणत तिनं केतनकडे लोहगडावर जाण्यासाठी लकडा लावला. यासाठी तिनं केतनच्या आईलादेखील क़ॉल केला होता. सियाचा हट्ट पाहता अखेर तयार झाला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा