• Fri. Aug 7th, 2026

    Aditya Thackeray Emotional : मी पहाडासारखा उभा, जबाबदारी स्वीकारेन, पक्षप्रमुखपदावरुन हटायलाही तयार; उद्धव ठाकरेंच्या या शब्दांनंतर आदित्यंच्या डोळ्यात तरळले अश्रू

    Aditya Thackeray Emotional : मी पहाडासारखा उभा, जबाबदारी स्वीकारेन, पक्षप्रमुखपदावरुन हटायलाही तयार; उद्धव ठाकरेंच्या या शब्दांनंतर आदित्यंच्या डोळ्यात तरळले अश्रू

    Uddhav Thackeray Speech: शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी पक्षासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी दाखवली. त्याच्या “मी शिवसेनेच्या पदावरून हटायलाही तयार” या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे भावूक झाल्याची चर्चा रंगली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईत आज शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांचे स्वतंत्र मेळावे पार पडले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भावनिक वक्तव्य केले. पक्ष आणि शिवसैनिकांसाठी कोणताही त्याग करण्याची तयारी असल्याचे सांगताना त्यांनी, “गरज पडली तर मी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावरून हटायलाही तयार आहे,” असे म्हटले. ठाकरे गटाला बसलेल्या सहा खासदारांच्या धक्क्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा झाला. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली. बाळासाहेब आदेश देऊन गेलेत, जाब विचारा असा संदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला. असे भावनिक वक्तव्यही त्यांनी केले. नऊपैकी फक्त तीन खासदार ठाकरे गटासोबत असल्याचे चित्र दिसले.

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर आयोजित या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले होते. भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पक्षातील घडामोडी, सध्याची राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेच्या वाटचालीवर भाष्य केले. याच वेळी त्यांनी पदापेक्षा पक्ष आणि शिवसैनिक महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य सुरू असताना मंचावर उपस्थित असलेले आमदार आणि उद्धव यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे खूपच भावूक झाल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले.

    Uddhav Thackeray

    दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील खासदारांच्या बंडावर भाष्य करत “हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे” असा इशारा दिला. शिवसेना राज्यभर वेगाने वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा वारंवार उल्लेख करत त्यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा कायम ठेवत पुढील राजकीय घडामोडींचे संकेत मिळाले आहेत.

    Maharashtra TimesShrikant Shinde : उबाठामध्ये पुन्हा बंडखोरी का झाली? एकनाथ शिंदेंच्या भाषणापूर्वीच श्रीकांत शिंदेंचा ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठा खुलासा

    दरम्यान, २०२२ मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केलं होतं. महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या युतीवरून त्यांचे आणि आमदारांचे उद्धव ठाकरेंबरोबर मतभेद झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार आणि नंतर खासदार ठाकरेंना सोडून गेले होते. या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळले होते. निवडणूक आयोगाने नंतर शिंदे गटालाच मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिले होते. त्यानंतर आता ४ वर्षांत शिवसेनेत पुन्हा एकदा सहा खासदार जे मशाल या चिन्हावर निवडून आले होते, तेही ठाकरेंना सोडून शिंदे गटात जात आहेत, याबाबत पुढील दोन दिवसांत सगळं चित्र स्पष्ट होईल असं खासदार श्रीकांत शिंदेही म्हणाले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा