• Mon. Jun 15th, 2026
    कोकणवासियांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार! 263 किमी लांब मार्गाचं दुपदरीकरण; प्रस्ताव केंद्राकडे सादर

    Konkan Railway Expansion: कोकण रेल्वेने मार्गाच्या विस्ताराचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे. यासाठी 4,704 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 263 किमी लांब मार्गावर दुपदरीकरण करण्याची योजना आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: कोकण रेल्वेच्या विस्ताराची कोकणवासी गेली अनेक वर्ष प्रतीक्षा करत आहेत. आता कोकणवासियांचं स्वप्न सत्यात उतरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणावर काम सुरू होणार आहे. तब्बल 263 किलोमीटर लांब मार्गावर दुपदरीकरण, तीन नवीन रेल्वे स्थानक आणि अतिरिक्त लूप मार्गांचा विकास करण्याची योजना आहे. यामुळे कोकण रेल्वेचा महाविस्तार होणार आहे.

    नेमका प्रकल्प काय?

    कोकण रेल्वेच्या विस्तारासाठी पाच वर्षीय प्लॅन तयार केला गेला आहे. यासाठी एकूण 470.08 कोटींचा खर्च अपेक्षित असून रेल्वे बोर्डाकडे याचा प्रस्ताव पाठवला आहे अशी महिती कोकण रेल्वेचे संचालक आणि व्यवस्थापक संतोष कुमार झा यांनी ‘मिड-डे’सोबत बोलताना दिली. रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून ते कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ठोकूरदरम्यान 740 किमी लांब मार्गावरील कोंडी फोडण्याच्या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

    Maharashtra TimesShaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा! 298 गावांमध्ये सर्वेक्षण होणार; 40 तालुक्यातील 409 गावांना जोडणार

    ठोकूर ते मुकंबिका रोड-ब्यनदूर या मार्गावर 112 किमी तर वैभववाडी ते माजोर्डा या मार्गावर 151 किमी असं एकत्र 263 किलोमीटर मार्गावर दुपदरीकरण करण्यात येणार आहे. रोहा-मडगाव पट्ट्यावर क्षमतेपेक्षा 143 टक्के तर मडगाव ते ठोकूर पट्ट्यावर क्षमतेपेक्षा 128 टक्के अधिक प्रवासी प्रवास करतात असं एका नोव्हेंबर 2025मध्ये झालेल्या सर्वेक्षणात समोर आलं होतं. त्यामुळे या मार्गाचं दुपदरीकरण करण्याची योजना तयार केली. या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला असून जून 30पर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर केवळ 54.66 किमी मार्गां दुपदरीकरण करण्यात आलं आहे.

    तीन नवीन स्थानकं कुठे?

    मायेम, मुकंबिाका रोड-ब्यनदूर आणि न्यूरा-ओ-ग्रान्डे या ठिकाणी तीन नवी क्रॉसिंग स्थानकं बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासह गोकर्णा मार्ग, होन्नावर,बरकूर, उडुपी, अंकोला या ठिकाणी लूप मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 696.77 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी आणि कोंडी कमी करण्यात यश येण्याची शक्यता आहे.

    याशिवाय मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचे डबे वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. या ट्रेनसाठी मोटी डिमांड आहे अशी माहिती झा यांनी ‘मिड डे’ ला दिली. वंदे भारत ट्रेनसध्या आठ डब्यांची आहे. मुंबई लोकलहूनही कमी डबे असलेल्या या ट्रेनमधून प्रवासी मोठ्या संख्येने प्रावस करतात. त्यामुळे या मार्गावर एक्सप्रेसची क्षमता वाढवण्याची गरज आहे.

    Maharashtra TimesNorth Coastal Road: दक्षिण मुंबई ते भाईंदर सिग्नलमुक्त प्रवास! सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याला गती; कधी पूर्ण होणार?

    याशिवाय या मार्गावर 11 लेवल-क्रॉसिंग गेट, 48 स्थानकांवर विद्युत इंटरलॉकिंग प्रणाली आणि कवच प्रणालीही विकसित केली जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा