#sadabhaukhot #rohitpawar #rohitpawarprotest #farmer #ncp आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे,पापमोक्ष होण्यासाठी असल्याची बोचरी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.संपूर्ण शेतकरी कर्जमाफी करावी,या मागणीसाठी पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवाराकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे,यावरून आमदार सदाभाऊ खोत,यांनी रोहित पवारांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता नवीन भिडू आलाय याचा स्वागत आहे. पण त्याआधी राज्याचे खाजगी साखर कारखाने सहकारी करण्याची मागणी रोहित पवारांनी करावी,शेतकऱ्यांच्या एफआरपी देण्याची मागणी करावी,आणि महाराष्ट्रातील जिल्हा बँक,सूतगिरण्या,दूध संघ कुणी खाऊन टाकल्या, हे पण रोहित पवारांनी सांगावं असं टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.