अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्वलंत होत चालला आहे.अनुसूचित जातीसाठी उपवर्गीकरण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सकल मातंग समाजाने वज्रमूठ बांधली आहे.सोलापुरात सोमवारी सकल मातंग समाजाची राज्य स्तरीय बैठक संपन्न झाली.या संदर्भात आगामी विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दा मांडण्याचे ठरले.