• Fri. Jun 5th, 2026

    Vidhan Parishad Election: निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजपकडून कोट्यवधी रुपयांच्या ‘ऑफर्स’; हर्षवर्धन सपकाळांचा गौप्यस्फोट

    Vidhan Parishad Election: निवडणुकीतून माघार घेण्यासाठी भाजपकडून कोट्यवधी रुपयांच्या ‘ऑफर्स’; हर्षवर्धन सपकाळांचा गौप्यस्फोट

    Harshwardhan Sapkal On BJP: विधान परिषदेच्या १७ पैकी पाच मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार रिंगणात असल्याने तेथील निवडणूक बिनविरोध झाली आहे.

    हर्षवर्धन सपकाळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : भाजपची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या हव्यासापोटी ते लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ‘ऑफर्स’ दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी भाजपने नैतिकता गुंडाळून सर्व हातखंडे वापरले आहेत. भाजपला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टीम’ नाही तर ‘नॉमिनेशन सिस्टीम’ भाजपला हवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

    विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर सपकाळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की विधान परिषदेच्या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीचा मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी असतात. हा मर्यादित मतदार असतो. मात्र, या निवडणुकीतदेखील राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’चा खेळ खुलआमपणे सुरू आहे.

    Dillip walse Patil यांनी Sharad Pawar यांची भेट घेतली, नेमकं कारण काय?

    अर्ज माघारीसाठी जवळपास दीडशे कोटी खर्च- संजय राऊत
    विधान परिषदेच्या अहिल्यानगर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली आहे. मात्र, या मतदारसंघात अपक्ष दत्तात्रय पानसरे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर पानसरे यांचे आव्हान आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे बंडखोर समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने भाजपला दिलासा मिळाला आहे. नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवीण पाटील-चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

    Maharashtra TimesMaratha Reservation: मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला, हेल्पलाइन नंबरही जारी
    राज्यात विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, असा आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला. निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी आज जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रमुख उमेदवारांना किमान २५ कोटी रुपये दिले गेले आहेत. काल मुंबईतील सॉफीटेल या हॉटेलमध्ये एक व्यवहार झाला. त्यानंतर कोकणातील रायगडमध्ये माघार घेण्यात आली. संभाजीनगरात आमच्या एका उमेदवाराने माघार घेतली. तिथेही साधारण त्याच पद्धतीने व्यवहार झाले’, असे राऊत म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा