शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणेच कडक अटी आणि फसवणूकीचा धोका नको, राजू शेट्टींनी म्हटले. कर्जमाफीबाबत सरकारने भूमिका ताबडतोब स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींकडून करण्यात आली आहे. यासोबतच येत्या 30 जूनपर्यंत प्रत्येक गरजू शेतकऱ्याचे कर्ज माफ झाले नाही, तर त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र हल्लाबोल करण्याचा इशारा दिला आहे.