दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत, तर दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांनी देखील विलीनीकरणाबाबत आपापली मतं व्यक्त केली आहेत. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले नेते संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया समोर आलीय. ज्यांना पश्चाताप होतोय, त्यांनी परत यावं असं म्हणताना राऊतांनी अट देखील ठेवली आहे.