अरविंद कुमार रंगाराव अल्लू (वय ५०), शिवा अप्पाराव भुक्का (वय ३५, दोघेही रा. येल्लूर, आंध्र प्रदेश) असे मृत ट्रकचालक व क्लीनरची नावे आहेत. इर्टिगा कारचालक सौरभ मुकिंदा सस्ते (वय २६), लीलाबाई किसन सस्ते (वय ७६) व महेंद्रकुमार पॉल (वय ३९, तिघेही रा. खारघर, रायगड) हे जखमी झाले आहेत.
Pune MLC Election: राष्ट्रवादीत हाय-व्होल्टेज ड्रामा! विक्रम काकडेंना उमेदवारी, सुनील टिंगरेंना ‘कात्रजचा घाट’; अनेक नेते नाराज
खोपोली महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे तांदूळ व खाद्यतेलासह इतर साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे (एपी ३९ टीझेड १३४९) खंडाळा घाटातील उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जात असलेल्या कंटेनरवर (जी जे २३ ए डब्ल्यू ४४२३) मागून जोरात धडकला. या धडकेत दोन्ही वाहने महामार्गावरच उलटली. याच दरम्यान मागून वेगात येणाऱ्या इर्टिगा कारचालकाला (एमएच ३१ जीए ५२०३) अपघातग्रस्त वाहनांचा अंदाज न आल्यामुळे इर्टिगा कार अपघातग्रस्त वाहनांवर आदळली. यात ट्रकचालकासह क्लीनरचा जागीच मृत्यू झाला, तर इर्टिगा कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस निरीक्षक विनोद मालवे, बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील, पोलिस उपनिरीक्षक सरोदे, प्रभाकर मोहिते, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, फौजदार अमोल धायगुडे, कौशिक फेंगडू यांच्यासह देवदूत आपत्कालीन पथक आणि डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
Pune ST Bus: स्पीड ब्रेकरवर बस आदळल्याने 23 वर्षीय तरुणीचा मणका फ्रॅक्चर; संवेदनाही हरपली, बसचालकावर गुन्हा
या अपघातामुळे ट्रकमधील तांदळाच्या गोण्या, खाद्यतेलाचे डबे, बॉक्स व इतर साहित्य मार्गावर विखुरल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या चारही मार्गिका बंद झाल्या होत्या. परिणामी, वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महामार्ग पोलिस आणि खोपोली पोलिसांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह कनेक्टिंग लिंक मार्गावरील वाहतूक एक ते दीड तास रोखल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पोलिसांनी ‘डेल्टा फोर्स’ व ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मार्गावर विखुरलेले साहित्य हटविले. त्यानंतर तिन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
