भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या ट्रेनपैकी एक असलेली आणि आजही लोकांची सेवा करत असलेली पंजाब मेलने १ जून २०२६ रोजी आपल्या गौरवशाली ११५ व्या वर्षात पदार्पण केले. 12137 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेलने १ जून २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रस्थान करताना आपल्या प्रवाशांच्या सेवेची ११४ वर्षे पूर्ण केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : एखादी एखादी एक्सप्रेस ट्रेन किती वर्षांपासून अविरत सुविधा देऊ शकते याचं उदाहरण ‘ पंजाब मेल ‘कडे पाहिल्यानंतर मिळते. पंजाब मेलने प्रवाशांच्या सेवेची तब्बल 114 वर्षे पूर्ण केली आहेत. २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित ट्रेन महोत्सवाच्या निमित्तानेही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रवासी, रेल्वे अधिकारी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित ट्रेनपैकी एक असलेल्या पंजाब मेलच्या गौरवशाली प्रवासाचे दर्शन घडविणारे आकर्षक दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच भारतीय रेल्वेतील पंजाब मेलच्या अग्रगण्य योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
ऐतिहासिक वारसा
पंजाब मेल, जी मूळतः “पंजाब लिमिटेड” म्हणून ओळखली जात होती, ही भारतीय रेल्वेतील सर्वात जुन्या ट्रेनपैकी एक आहे. प्रसिद्ध फ्रंटियर मेलपेक्षाही ती १६ वर्षांहून अधिक जुनी आहे. बॅलार्ड पिअर मोल स्टेशन हे एकेकाळी ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे (GIPR) सेवांचे प्रमुख केंद्र होते आणि याच ठिकाणाहून पंजाब मेलने आपल्या प्रवासाची सुरुवात केली.
पंजाब मेलचा प्रवास
पंजाब मेल १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल स्टेशनवरून प्रथम धावली, जे त्यावेळी जीआयपीआर (ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे) सेवांचे केंद्र होते.
ही ट्रेन मुंबईच्या बॅलार्ड पिअर मोल स्टेशनवरून ठरलेल्या दिवशी थेट पेशावरपर्यंत धावत असे, ज्यात २,४९६ किमी अंतर अंदाजे ४७ तासांत कापले जात असे.
ट्रेनचा मार्ग प्रामुख्याने जीआयपीआर ट्रॅकवरून जात असे आणि पेशावर कॅन्टोन्मेंट येथे थांबण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोर यांसारख्या प्रमुख शहरांमधून जात असे.
१९१४ मध्ये, ही सेवा बॉम्बे व्हीटी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई) येथून सुरू होऊन तेथेच संपू लागली आणि १,५४१ किमीचा बॉम्बे-दिल्ली जीआयपीआर मार्ग २९ तास ३० मिनिटांत पूर्ण करणारी दैनंदिन सेवा बनली.
१९२० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, हा प्रवासाचा वेळ आणखी कमी करून २७ तास १० मिनिटे करण्यात आला.
१९७२ मध्ये अतिरिक्त थांबे जोडल्यामुळे प्रवासाचा वेळ पुन्हा २९ तासांपर्यंत वाढवण्यात आला.
आज, पंजाब मेल मुंबई आणि फिरोजपूर कॅन्टोन्मेंट दरम्यानचे १,९२८ किमीचे अंतर ३३ तास ३५ मिनिटांत पार करते आणि मार्गावर ५२ स्थानकांवर थांबते.
गेल्या काही वर्षांतील डबे आणि इंजिनप्रणाली
मूळतः या ट्रेनला सहा डबे होते: तीन प्रवाशांसाठी आणि तीन टपाल व मालासाठी. तीन प्रवासी डब्यांमधून अंदाजे २८८ प्रवासी प्रवास करत असत.
१९३० च्या दशकाच्या मध्यात, तृतीय श्रेणीचे डबे सुरू करण्यात आले.
१९४५ मध्ये, वातानुकूलित डबे सुरू करण्यात आले.
१९६८ मध्ये, ही ट्रेन झाशीपर्यंत डिझेल इंजिनावर चालवण्यात आली आणि नंतर १९७६ पर्यंत तिचा विस्तार झाशी ते नवी दिल्ली आणि अखेरीस फिरोजपूरपर्यंत करण्यात आला.
१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात / १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला, इगतपुरीपर्यंत ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनावर चालवण्यासाठी ड्युअल-करंट लोकोमोटिव्ह (WCAM/1) वापरण्यात आले आणि पुढील प्रवासासाठी इंजिन बदलले जात असे.
पंजाब मेलच्या पारंपरिक डब्यांच्या जागी एलएचबी (LHB) डबे बसवण्यात आले आणि १ डिसेंबर २०२० पासून ही ट्रेन एलएचबी डब्यांसह धावू लागली.
ही ट्रेन आता विजेवर चालते आणि तिच्या रेस्टॉरंट कारच्या जागी पॅन्ट्री कार बसवण्यात आली आहे.
सध्या, ही ट्रेन २५०% पेक्षा जास्त प्रवासी क्षमतेने धावते आणि त्यात खालील संरचनेचा समावेश आहे : १ प्रथम वातानुकूलित सह वातानुकूलित द्वितीय श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर व्हॅन आणि १ एसएलआर (गार्ड व सामान वाहतूक डबा).
यावर्षी पंजाब मेलमध्ये प्रवासी सुविधांच्या उन्नतीकरणासाठी व्यापक सुधारणा करण्यात आल्या असून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे: बाह्य सजावट: प्रथम वातानुकूलित-द्वितीय वातानुकूलित संयुक्त डबा आणि पॅन्ट्री कारवर वारसा-आधारित संकल्पनांवर आधारित व्हिनाइल रॅपिंग करण्यात आले.
सांस्कृतिक एकात्मता आणि वारसा:
(१) पंजाब मेलचा १९१२ पासूनचा वारसा, महाराष्ट्र-पंजाब यांतील सांस्कृतिक नाते आणि स्वातंत्र्यलढ्याशी असलेला संबंध दर्शविणारी रचना तयार करण्यात आली असून त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया आणि सुवर्ण मंदिर यांच्या स्क्रीन प्रिंट्सचा समावेश आहे.
(२) वातानुकूलित डब्यांच्या आतील भागात जलरोधक कॅनव्हास प्रिंट्स लावण्यात आल्या असून त्यामुळे संग्रहालयासारखा अनुभव मिळतो. तसेच सर्व डब्यांमध्ये एकसमानता राखण्यासाठी वारसा-आधारित फलक लावण्यात आले आहेत.
स्वच्छता सुधारणा: ऑटो एअर फ्रेशनर्स, सीट कव्हर डिस्पेन्सर्स, सुधारित बिब कॉक, साबण डिस्पेन्सर्स, पीव्हीसी फ्लोअरिंग दुरुस्ती आणि स्क्रेपर मॅट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सामान्य भाग: गँगवे, प्रवेशद्वारे आणि स्वच्छतागृहांमध्ये अधिक टिकाऊपणासाठी व्हिनाइल रॅपिंग करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा