MSRTC Foundation Day: 1948मध्ये सुरु झालेल्या एसटी बसला आज 78 वर्ष पूर्ण होत आहेत. यामुळे प्रवाशांसाठी महामंडळाने एन मोठा निर्णय घेतला असून स्वच्छतागृह आता अधिक साफ असतील व ते वापरण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७८व्या वर्धापनदिनानिमित्त आज, १ जूनपासून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच, यंदा ७८ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय प्रवाशांना एसटीतील सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार आहे. या स्वच्छता मोहिमेआधी, म्हणजे १५ एप्रिलपासून महामंडळाने प्रतितिकीट दोन रुपये अधिभार लागू केला आहे.
अधिक सुविधा उपलब्ध होणार
दोन ते १० रुपये घेऊनही एसटी स्थानक, आगारातील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. स्थानक-आगार परिसरात अस्वच्छता आणि पाणपोईंची दुरवस्था आहे. यामुळे प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत स्थानक आणि आगार परिसराची दर चार तासांनी स्वच्छता, दुर्लक्षित पाणपोई पुन्हा सुरू करणे, तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Mumbai BEST Bus: ‘बेस्ट’ची कोंडी फोडण्यासाठी नवे नियोजन, दादरमधील बसचे मार्ग बदलणार; प्रवाशांना फटका बसणार
या बद्दल दोन महिन्यांपूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घोषणा केली होती. यापूर्वी स्वच्छतागृहांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदाराला दिली होती. तरी अस्वच्छतेच्या तक्रारी कायम होत्या. आता ही व्यवस्था बंद झाली आहे. स्वच्छतागृहांच्या देखभालीची आणि सर्व सुविधा देण्याची जबाबदारी पूर्णपणे एसटी महामंडळाकडे सोपवली गेली आहे. यामुळे सर्व आगारात एक समान सेवा पुरवल्या जाणार आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवासावेळी होणारा अतिरिक्त खर्च कमी होणार आहे. त्याशिवाय स्वच्छतागृहांमध्ये सुविधा आणि स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यावरही भर दिला जाणार आहे. दरम्यान, प्रवशांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रमुख बस डेपोंमध्ये मोफत पिण्याच्या पाण्याचे स्थानकं उभारण्याचीही महामंडळाची योजना आहे. यामुळे एसटी प्रवास अधिक सुखकर होणार आहे. प्रवाशांना कमीत-कमी खर्चात आरामदायी प्रवास आणि सोयी-सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
Bhiwandi ST Depot: पाच दशकांहून जुन्या भिवंडी एसटी स्थानकाची अखेर पुनर्बांधणी; इमारत, फलाटांचा विकास, हजारो प्रवाशांना फायदा
राज्यात एसटी महामंडळाचा वर्धापनदिन १ जून रोजी साजरा केला जातो. १ जून १९४८ रोजी पुण्यातून पहिल्या लालपरीला सुरुवात झाली. यंदा एसटीला ७८ वर्ष पूर्ण होतील. त्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. याशिवाय एसटीचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात ८००० नव्या बससे येणार आहेत.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा