• Fri. Jun 5th, 2026

    शिंदेंना झटका देण्यासाठी फडणवीसांना फोन? आदित्य ठाकरे बिनधास्त बोलले

    शिंदेंना झटका देण्यासाठी फडणवीसांना फोन? आदित्य ठाकरे बिनधास्त बोलले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मध्यरात्री मातोश्रीहून थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन गेला असल्याची बातमी आली आणि राजकारणात पुन्हा नवी समीकरणं पाहायला मिळतील की काय अशी चर्चा रंगू लागली. आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर गंभीर आरोप करत मुंबईतील जमिनी लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला होता. पण या प्रकरणाला मोठं वळण मिळालं ते मध्यरात्री झालेल्या कथित फोन कॉलमुळे. मातोश्रीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन गेल्याची चर्चा रंगली आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या निर्णयांना ब्रेक लागल्याची माहिती समोर आली. या सर्व घडामोडींनंतर आता आदित्य ठाकरेंनी स्वतः फोनबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed