• Sat. Jun 6th, 2026
    Chhagan Bhujbal : ‘हम साथ-साथ, आमच्यात वाद नाही’, सुनील तटकरे यांच्यासोबत येत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाल्याची चर्चा समोर आली होती. पण या चर्चा भुजबळांनी आज पुन्हा फेटाळल्या आहेत. विशेष म्हणजे आज भुजबळ आणि तटकरे एकत्र माध्यमांसमोर आले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे एकत्र बाहेर आले. यावेळी त्यांनी दोघांमध्ये कोणताही वाद झाला नसून हम साथ-साथ हैं, असं म्हटलं. यावेळी सुनील तटकरे यांनी बैठकीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली, या विषयी माहिती दिली. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपला सुनील तटकरे यांच्यासोबत कोणताही वाद नाही. तसेच टेंडर किंवा कोणत्याही मुद्द्यावरुन खासदार पार्थ पवार यांच्यासोबत आपला वाद झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    सुनील तटकरे काय म्हणाले?

    “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार पार्थ पवार आणि मी स्वत: उपस्थित होतो. आम्ही एकंदरीत सर्व जागांवर चर्चा केली”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

    ‘विधान परिषदेच्या जागावाटपाचा उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार’

    “महायुती म्हणून या 17 जागांच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. महायुतीत अनेक जागांवर एक मत झालं आहे. काही जागांवर चर्चा सुरु आहे. उद्या दुपारपर्यंत नक्की या संदर्भात कळेल की महायुतीमधील प्रमुख घटकपक्ष असलेला भाजप पक्ष कुठल्या जागा लढेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना कुठल्या जागा लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्या जागा लढणार याची स्पष्टता उद्या दुपारपर्यंत येईल”, अशी महत्त्वाची माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

    “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा हव्या आहेत याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. उद्या दुपारपर्यंत याबाबत निर्णय होईल. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराची निवड केली जाईल”, असीदेखील माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

    छगन भुजबळ काय म्हणाले?

    “अरे, आम्ही एकत्र आहोत. आताही आम्ही साथ-साथ आहेत. असा काहीही वितंड वाद झालेला नाही. पण आता आपण लोकांनी सांगितलं वितंड वाद झाला. आता आपण बघा. हम साथ-साथ हैं”, असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी पत्रकारांनी छगन भुजबळ यांना कंत्राटाच्या मुद्द्यावरुन पार्थ पवार यांच्यासोबत वाद झाला का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. “अजिबात वाद झालेला नाही. अहो आता सगळं ऑनलाइन आहे. त्यावर कोर्टाचा स्टे आहे. त्यानंतर कॅबिनेटने दोनवेळा मंजूर केलेल्या आहेत. त्यानंतर ऑनलाइन काम सुरु झालं आहे. त्यानंतर अगोदर टेक्निकल बीट, मग फायनान्शिअल बीट, नंतर कोट… कसं काय वाद करणार ते कळत नाही”, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा