सुधीर पाटील, सातारा: महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या तरूणांची स्कार्पिओ कार आंबेनळी घाटात जवळपास 1 हजार फूट दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 8 तरूण जागीच ठार झाले आहेत. रात्रीपासून महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अॅण्ड रेस्क्यू टीम तसेच प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
आंबेनळी घाटात स्कार्पिओ कार 1000 फूट दरीत कोसळून कारमधील सर्वच्या सर्व 8 तरूणांचा मृत्यू झाला आहे. मृत तरूण हे आसगाव (ता. कोरेगाव) येथील रहिवाशी होते. मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20,), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 35 ) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) या तरुणांचा समावेश आहे.
आंबेनळी घाटातील दरीत कोसळेली कार (क्र. MH 11 DN 2340) ही सातारा जिल्ह्यातील आसगाव (ता. कोरेगाव) येथील आहे. खोल दरीत कार कोसळल्याने सर्व तरूण जागीच ठार झाले असून स्कार्पिओ कारचा चेंदामेंदा झाला आहे. सध्या मृतदेह दरीतून वर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात हा अपघात घडला. वीकेंडला पर्यटनाचा आनंद घेऊन कोकणातून पुन्हा साताऱ्याकडे परतत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सोमवारी सकाळीही शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक, नातेवाईक आणि स्थानिक प्रशासन उपस्थित आहे. वाहनापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांकडून विशेष तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे.
2018 च्या महाभयंकर बस दुर्घटनेची आठवण ताजी
ज्या परिसरात हा अपघात घडला आहे, त्याच ठिकाणी 2018 मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा त्याच परिसरात स्कॉर्पिओ कारला अपघात झाल्यामुळे बस अपघाताच्या दुर्दैवी आठवणी ताज्या झाल्या आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा