शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी आता मोठं विधान केलंय.राष्ट्रवादी एकत्र याव्यात का हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.. पण काहीतरी चांगलं घडावं असं मत चव्हाणांनी व्यक्त केलं.. तसंच दोन्ही पक्ष एकत्र आल्याने महायुतीची ताकद वाढेल, असंही त्यांनी म्हटलं.