Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#kokanproject #ratnagiriproject #kokantourism #jaitapurproject #barsuproject #ratngiripollution कोकणात राजापूर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झालेल्या विरोधानंतर मागे पडला त्यानंतर बारसू नाणार येथील रिफायनरी प्रकल्प जनतेच्या विरोधानंतर रद्द झाला आता पुन्हा एकदा अणुऊर्जा प्रकल्पांची तयारी करण्यात आली आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदर इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीज व एनटीपीसी या तीन मोठ्या कंपन्याबरोबर सामंजस्य करार केले आहेत. मात्र यानंतर आता कोकणात पुन्हा एकदा वातावरण कापण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बारसू रत्नागिरी पूर्णगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील प्रकल्पांच्या या नव्या घोषणेनंतर आता काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे