• Sat. Jun 6th, 2026
    Bandra Demolition Drive : वांद्र्यात गरिबनगरमध्ये राडा, दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; पोलिसांचा मोठा इशारा

    वांद्रे पूर्व परिसरात अतिक्रमण विरोधात कारवाई करणाऱ्या पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांच्या विरोधात कठोर कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आज मोठा राडा झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्व येथे स्टेशन लगत असलेल्या गरिबनगर परिसरात असलेल्या शेकडो अनधिकृत झोपडपट्यांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे. अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात असताना गरिबनगर परिसरातील स्थानिक नागरिक आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी सुरुवातीला नागरिकांना शांत आणि संयमीपणे समजावण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक जास्त आक्रमक झाल्याने पोलिसांना या परिसरात सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

    पोलिसांकडून सर्व परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवले जात असताना अचानक काही समाजकंटकांकडून पोलिसांच्या दिशेला दगडफेक सुरु झाली. यावेळी पोलिसांनी काही जणांची धरपकड केली. तसेच सौम्य लाठीचार्ज करुन गर्दी पांगली. या घटनेबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

    ‘दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार’

    “मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईच्या वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गरिबनगर परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम म्हणजेच अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाई दरम्यान काही समाजकंटकांनी कारवाई करणाऱ्या पथकांवर दगडफेक करत या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला”, असं अभिनव देशमुख यांनी सांगितलं.

    “यावेळी मुंबई पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या प्रमाणात पोलीस बळाचा वापर करुन समाजकंटकांना पांगवले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तोडफोड आणि हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे”, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली.

    ‘भाजपकडून जात, धर्माचा रंग देण्याचा प्रकार’, वरुण सरदेसाई यांची टीका

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. “जेव्हापासून ही तोडक कारवाई सुरु झाली, तेव्हापासून तिथे सर्व गोंधळ पाहत आहे. आपण सगळ्यांनी वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेतले पाहिजे. गरिबनगर हा भाग वांद्रे पूर्वे परिसरात रेल्वे ट्रॅकला लागून असलेली वस्ती आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील हा सर्व भाग आहे. पश्चिम रेल्वेला त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे. याकरता त्यांना ती जमीन आहे. त्यांना वांद्रे स्थानकापासून वांद्रे लोकल स्थानक जोडायचं आहे. वांद्रे टर्मिनसवरुन अतिरिक्त ट्रेन सोडायच्या आहेत. त्यासाठी त्यांना ती जमीन हवी होती”, असं वरुण सरदेसाई म्हणाले.

    “ही जमीन रिकामी व्हावी याकरता गेली नऊ वर्षे पश्चिम रेल्वे विरुद्ध गरीबनगरचे रहिवासी असा खटला हायकोर्टात सुरु होते. त्या खटल्याच्या निकालात हायकोर्टाने असे निर्देश दिले की, ही जागा रिकामी करण्यात यावी. इकडचे एन्क्रोचमेंट काढण्यात यावेत. हायकोर्टाच्या आदेशानुसार ही तोडक कारवाई पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली. पण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं, हिंदू-मुस्लीम नॅरेटिव्ह तयार करायचं ही भाजपची जुनी स्ट्रॅटेजी आहे. तसा परत एकदा प्रयत्न भाजपकडून झाला. भाजपने जात, धर्माचा रंग देण्याचा प्रकार केला”, अशी टीका वरुण सरदेसाई यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा