Raigad-Rajgad Road: पुणे जिल्ह्याला रायगडशी थेट जोडणाऱ्या या मार्गाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. केळद ते शेवते रस्ता जर पूर्ण झाला तर पुणे ते महाड अंतर तब्बल 50 किलोमीटरने कमी होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुरुषोत्तम मुसळे, भोर: राजगड तालुक्यातील वेल्हे केळद ते रायगडमधील शेवते महाड या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले आहे. पायथ्यापासून उंच भागातून १८ किलोमीटर लांबीचा हा रस्ता प्रस्तावित आहे. सुरुवातीचे जेमतेम दोन किलोमीटरचे काम होऊन निधी व इतर तांत्रिक अडचणींमुळे पुढील काम बंद पडले आहे. पुढच्या १३ किलोमीटरपैकी सहा किलोमीटर कच्चा रस्ता झाला आहे.
वेल्हे तालुक्याचे ‘राजगड’ असे नामकरण झाले. किल्ले राजगडला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाले. मात्र, या तालुक्यातील पायाभूत सुविधा कधी मार्गी लागणार, याचे उत्तर कोणाकडे नाही. ‘या रस्त्याचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले आहे. एक मोठा पूल आणि उर्वरित कामाला मंजुरी मिळालेली नाही,’ असे वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जीवनाथ झेंडे यांनी सांगितले.
Mahabaleshwar to Konkan Bridge: रत्नागिरी-सातारा अंतर ५० किलोमीटरने घटणार! कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल तयार; लवकरच होणार उद्घाटन
‘तेरा किलोमीटर कामापैकी सहा किलोमीटर रस्त्याचे खडीकरण झाले आहे. पुढे वन विभागाची परवानगी मिळणे बाकी आहे. मोठी यंत्रे नेण्यासाठी खूप अडचणी आहेत,’ असे ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता ए. डी. पाटील म्हणाले.
असा आहे प्रकल्प
वेल्हे खुर्द ते भोरडी फाटा ते शेवते (महाड) एकूण १८ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. त्यापैकी टप्पा दोनमधून तेरा किलोमीटरसाठी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २५ कोटी ३२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पाच किलोमीटरपैकी २.८ किलोमीटर कामासाठी पाच कोटी निधी मंजूर झाला. त्यामध्ये सपाटीकरण करून, साडेसात मीटर रुंदीचा डांबरी रस्ता होणार आहे.
रस्ता का महत्त्वाचा?
या रस्त्यामुळे पुणे व रायगड हे जिल्हे कमी अंतराने जोडले जातील. पुरंदर विमानतळ येथून जवळ आहे. पुणे-महाड अंतर ५० किलोमीटरने कमी होऊन, वेळेची बचत होईल. स्थानिक पर्यटनाही चालना मिळेल.
Purandar International Airport: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला वेग; 150 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, 15 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार
विलंब कशामुळे?
उर्वरित कामासाठी निधी मिळत नसल्याने काम रखडले आहे. गुगुळशी ते शेवते या भागात वन विभागाची कामाला परवानगी मिळालेली नाही. यात एक मोठा पूल, २.२ किलोमीटर कामासाठी परवानगी गरजेची आहे. यासाठी राजगड विकास व मित्र मंडळ आणि कृती समितीचे निमंत्रक ॲड. एन. डी. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व संबधितांना विनंती पत्र दिले आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा