• Tue. Jun 16th, 2026

    NEET Paper Leak: राजस्थानातून सुरुवात ते थेट पुण्यातील ब्युटी पार्लरमध्ये कांड; १ मे ते १७ मेपर्यंत काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम उलगडला

    NEET Paper Leak: राजस्थानातून सुरुवात ते थेट पुण्यातील ब्युटी पार्लरमध्ये कांड; १ मे ते १७ मेपर्यंत काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम उलगडला

    NEET Exam News: ‘आरसीसी’च्या लातूरमधील मुख्य शाखेसह नऊ शाखा चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकून फुटलेली प्रश्नपत्रिका रविवारी जप्त केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात धक्कादायक माहिती उघड केली आहे. ‘नीट (यूजी) परीक्षा २०२६च्या प्रश्नपत्रिका फोडण्यात आणि त्या पसरवण्यात मोटेगावकर याचा थेट सहभाग आहे.

    NEET पेपर लीक(फोटो– Navbharat Times)
    मुंबई: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिली असून या प्रकरणात महाराष्ट्रातूनही काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लातूर येथील ‘रेणुकाई करिअर सेंटर’चा (आरसीसी) संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर याला अटक केली असून पुण्यातील जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. राज्यात या प्रकरणाचे धागेदोरे आढळले असले तरी या पेपरफुटीची सुरुवात राजस्थानातून झाल्याचं समोर आलं आहे.

    ‘नीट’चा पेपर कसा फुटला?

    १ ते २ मे २०२६ : ‘गेस पेपर’ची राजस्थानमध्ये एंट्री. ‘गेस पेपर’ नावाने प्रश्नपत्रिकेसदृश संच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा संच हरियाणामार्गे सिकरमध्ये पोहोचल्याचा दावा तपासात समोर आला.

    ३ मे २०२६ : नीट-यूजी परीक्षा पार पडली. साधारण २२ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच प्रश्नपत्रिकेशी जुळणारे पीडीएफ फिरू लागल्याची चर्चा सुरू झाली. या रात्री सिकरमधून पहिला मोठा संशय. सिकरमधील एका शिक्षकाकडे विद्यार्थ्याने दोन पीडीएफ आणल्याचे वृत्त समोर आले. पीडीएफ प्रश्नपत्रिकेची ओळीनुसार पडताळणी केल्यानंतर गळतीचा संशय बळावला.

    ६ मे २०२६ : शिक्षकाने पीडीएफ आणि प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट काढून ते एनटीएला ई-मेल केले.

    ८ मे २०२६ : एनटीएने माहितीची शहानिशा करून, संबंधित प्राथमिक माहिती केंद्रीय यंत्रणांकडे पाठवली. त्यानंतर पेपरफुटीचे आरोप अधिकृत स्तरावर गंभीरपणे घेण्यात आले.

    ११ मे २०२६ : राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने सीकरमधील एका भाड्याच्या फ्लॅटमधून ‘गेस पेपर’ लीक करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला.

    १३ संशयित (नावे जाहीर केलेली नाहीत) : सिकर, झुनझुनू आणि डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आले.

    एका करिअर समुपदेशकाला सिकरमधून अटक.

    १२ मे २०२६ : एनटीएने केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले.

    १३ मे २०२६ : औपचारिक एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि विविध राज्यांत पसरलेल्या नेटवर्कमधील पाच मुख्य व्यक्तींना अटक केली.

    शुभम खैरनार : नाशिक येथून अटक. श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हेरून, प्रश्न पुरविण्याचे काम करीत होता.

    मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल : जयपूर (राजस्थान) येथून अटक. आपल्या मुलाला लीक झालेला पेपर मिळवून देण्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये दिल्याचा आरोप आहे.

    यश यादव : गुरुग्राम (हरियाणा) येथून अटक.

    १४ मे २०२६ (महाराष्ट्र कनेक्शन) : महाराष्ट्रातील पोलिस पथकांनी दोन मुख्य संशयितांना ताब्यात घेऊन सीबीआयकडे सुपूर्द केले.

    धनंजय लोखंडे या अहिल्यानगर येथील आयुर्वेदिक डॉक्टरला अटक.

    मनीषा वाघमारे या पुण्यातील ब्यूटीपार्लर चालक महिलेला अटक. वैद्यकीय विद्यार्थ्यांना गोळा करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप.

    १५ मे २०२६ : सीबीआयने बिहारमधील लॉजिस्टिक नेटवर्कचा शोध लावला. विद्यार्थ्यांना एकत्र ठेवून कॉपी करून घेण्यासाठी सुरक्षित जागा पुरवणाऱ्यांना अटक करण्यात आली.

    पी. व्ही. कुलकर्णी (एनटीएमध्ये केमिस्ट्री विषयाचे तज्ज्ञ) : लातूरमधील कॉलेजचा निवृत्त अध्यापक असून, निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाला. त्यांने प्रश्न पुरविल्याचा आरोप.

    १६ मे २०२६ (एनटीए एक्सपर्ट लीक) : तपासाची सुई एनटीएच्या अंतर्गत प्रशासनाकडे वळली. एका व्यक्तीने गोपनीयता भंग केल्याचे उघड झाले.

    मनीषा गुरुनाथ मांढरे पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये वरिष्ठ वनस्पतिशास्त्र अधिव्याख्याता असून, तिची एनटीएकडून विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षेपूर्वी आपल्या घरी विशेष कोचिंग क्लास घेऊन जीवशास्त्राचे प्रश्न लीक केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

    १७ मे २०२६ (कोचिंग क्लास नेटवर्क) : सीबीआयने पेपर लीक प्रकरणाशी जोडलेल्या कोचिंग नेटवर्कचा माग काढला.

    शिवराज मोटेगावकर या लातूर येथील ‘आरसीसी’ क्लासच्या संस्थापकाला अटक. पेपरफुटीत सक्रिय सहभाग असल्याच्या आरोप.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा