• Sat. Jun 6th, 2026

    Devendra Fadnavis : मोदींच्या आवाहनानंतर फडणवीस देशासाठी ॲक्शन मोडमध्ये, काल बाईक, आज सर्वसामान्यांप्रमाणे इंडिगो विमानाने प्रवास

    Devendra Fadnavis : मोदींच्या आवाहनानंतर फडणवीस देशासाठी ॲक्शन मोडमध्ये, काल बाईक, आज सर्वसामान्यांप्रमाणे इंडिगो विमानाने प्रवास

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आज इंडिगो विमानाने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला नियमित ताफा टाळून थेट बाईकने विधान भवनापर्यंत प्रवास केला होता. त्यानंतर त्यांनी आज सर्वसामान्यांप्रमाणे इंडिगोच्या प्रवासी विमानाने पुणे ते बंगळुरु असा प्रवास केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुचाकीने प्रवास केल्याची घटना ताजी असताना, त्यांनी आज पुन्हा एकदा एक स्तुत्य कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष विमानाचा प्रवास आज टाळला आहे. त्यांनी विशेष विमानाने प्रवास न करता सर्वसामान्य प्रवाशांसोबत इंडिगो विमानाने प्रवास केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे सध्याच्या तेल संकटाचं गांभीर्य अधोरेखित होत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तंतोतंत त्याचे पालन केले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून अशा कृतीतून राज्यातील जनतेला घटनेचं गांभीर्य ओळखून आपणही अशाप्रकारे सार्वजनिक वाहनांनी प्रवास करण्याचं आवाहन केलं जात आहे. सध्याच्या तेल संकटात इंधनाची बचत करणं ही आपली महत्त्वाची जबाबदीर असल्याने प्रत्येकाने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देवून या कठीण काळात देशाला साथ देणं आवश्यक असल्याची मुख्यमंत्र्यांची भावना आहे.

    मध्य पूर्वेत सुरु असलेल्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगावर पडताना दिसत आहेत. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे जगात भीषण तेल संकट निर्माण झालं आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल घेऊन येणाऱ्या वाहनांचा मार्ग अडवण्यात आला आहे. यामुळे तेलची पुरवठा साखळी खिळखिळी झाली आहे. याशिवाय इतर मार्गांतून तेल खरेदी करणं हे जास्त आव्हानाचं बनलं आहे. कारण या कच्च्या तेलाचा भाव हा जागतिक बाजारपेठांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा या परिस्थितीत देशाचं परकीय चलन जास्त खर्च होत आहे. अशा या परिस्थितीत भारतात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये किंवा अनपेक्षित इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

    विशेष म्हणजे भारताचं परकीय चलन जास्त खर्च होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना मोलाचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना खासगी वाहनांच्या ऐवजी सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी मेट्रो, इलेक्ट्रिक बसचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वाधिक वापर करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच इंधनाच्या बचतीसाठी मोदींनी नागरिकांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मोदींनी खाद्य तेलाचा वापरही जपून करण्याचं आवाहन केलं आहे.

    मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, तातडीने घेतले निर्णय

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सर्व आवाहनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर दुसऱ्याच दिवशी उच्च स्तरीय बैठक घेतली. त्यांनी सर्व मंत्र्यांना आपल्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट करण्याचे आदेश दिले. तसेच विशेष विमानाने प्रवास न करता सार्वजनिक विमानाने प्रवास करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावर तात्पुरते निर्बंध घातले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनं देखील कमी केली. विशेष म्हणजे त्यांनी मंत्रालय ते विधान भवन असा दुकाचीने प्रवास केला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी इंडिगोच्या विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुख्यमंत्र्यांचा आज सर्वसामान्य प्रवाशांप्रमाने विमान प्रवास

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्याहून बंगळुरूला विशेष विमानाऐवजी इंडिगोच्या नियमित प्रवासी विमानाने रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा व्यावहारिक उदाहरणाद्वारे संदेश दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल (गुरुवार) विधानभवनापर्यंत आपला नियमित ताफा टाळून बाइकने प्रवास केल्यानंतर, आजही फडणवीस यांनी सामान्य प्रवाशांसोबत विमान प्रवास करत सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन दिले. पुण्यावरून ते आर्ट ऑफ लिविंगच्या एका कार्यक्रमासाठी बंगळुरूकडे इंडिगोच्या सार्वजनिक विमानातून रवाना झाले.

    विशेष विमान किंवा सरकारी विमानाऐवजी व्यावसायिक विमान कंपनीच्या नियमित फ्लाइटचा वापर करून त्यांनी पर्यावरणस्नेही, अर्थव्यवस्थेला पूरक आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या वाहतुकीच्या सवयीला प्रोत्साहन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इंधन बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून प्रतिसाद दिला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा