मराठा आंदोलनातील बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना तात्काळ नोकरी द्या अशी मागणी गंगाधर काळकुटेंनी केली.बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत आणि एक शासकीय नोकरी देण्याची घोषित केले होते. शासनाने घोषित केल्याप्रमाणे अद्याप बीड जिल्ह्यात 64 जणांना नोकरी देण्यात आलेली नाही असा आरोप गंगाधर काळकुटे यांनी केला.शासनाने घोषित करूनही त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी न देणे हे सरकारचं गाफीलपणाचे धोरण आहे असं काळकुटे म्हणाले.१६ मे रोजी जरांगे पाटील यांच्या बैठकीत दिशादर्शक निर्णय होणार, असं गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं.