Vasai Creek Bridge: सध्या भाईंदरवरून वसईला जाण्यासाठी 39 किमी प्रवास करावा लागतो. हेच अंतर या नव्या पुलामुळे 5 किमी वर येऊ शकतं. पण अनेक कारणांमुळे गेली 13 वर्ष हा पूल रखडला होता. आता MMRDA ने एका बैठकीत नवा प्रस्ताव सादर केला आहे.
कसा असेल पूल?
2000 मध्ये पहिल्यांदा वसई ते भाईंदर पुलाची योजना मांडण्यात आली होती. त्यानंतर 2023मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. आता 13 वर्ष उलटून गेले असूनही या प्रकल्पाच्या कामाला काही सुरूवात झालेली नाही. या योजनेनुसार वसईच्या खाडीवर, मेट्रो मार्गिकेवर डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. सर्वात खाली रस्ता, त्यावरती मेट्रो लाइन 13चा मार्ग आणि सर्वात वरच्या स्तरावर पूल बांधण्यात येणार आहे.
High Risk Buildings: 827 अतिधोकादायक, तर 18 हजार इमारती धोकादायक! रहिवाशांवर जीव मुठीत धरून जगण्याची वेळ; महामुंबईत यादी जाहीर
सध्या भाईंदर ते वसई प्रवासात 39 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं. हा पूल तयार झाला तर हे अंतर अवघ्या 5 किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरून थेट 10 मिनिटे होण्याची शक्यता आहे. यामुळे वसई-विरारमधील लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या पुलासाठी एकूण अंदाजित खर्च 2,500 कोटी रुपये असेल. सध्या वापरल्या जाणाऱ्या 39 किमी लांब मार्गासाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
विलंबाचे कारण काय?
वसई-विरारचे माजी महापौर नारायण मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी 5 वेग वेगळ्या सरकारी यंत्रणांकडून मंजुरी मिळणं आवश्यक आहे. यापैकी महाराष्ट्र सागरी मंडळ, भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. पंरतु, या प्रकल्पासाठी खारफुटीची जमीन आणि मिठागरांची जमीनही संपादित करावी लागणार आहे. त्यामुळे वन विभाग आणि केंद्र सरकारच्या मीठ आयुक्तांकडून मंजुरी शिल्लक आहे. गेल्या आठवड्यात याबद्दल बैठक पार पडली असून पालघरचे जिल्हा अधिकारी, MMRDAचे आयुक्त, महसूल सचिव आणि कोकण विभागीय आयुक्तांचा समावेश होता.
वसई-भाईंदर पुलासाठी मिठागरांची जमीन संपादित करण्यापूर्वी या जमिनीवर राहणाऱ्या मीठ उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. 2013मध्ये या जमिनीवर राहणार्या 10 परिवारांनी जमिन त्यांच्या मालकीची असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण त्या जमिनींच्या नुकसान भरपाईचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे.
Mumbai News: वाहनांनंतर सागरी किनारा मार्गावर हेलिकॉप्टरचे उड्डाण; वरळी जेट्टीवर उभारणार ‘हेलिपॅड’, कसा होणार फायदा?
कुठून-कुठे जोडणार?
प्रस्तावित पूल मुंबई-वसईपासून थेट गुजरातपर्यंत एक दुवा म्हणून काम करेल. सध्या वसई आणि भाईंदरदरम्यान कोणताही थेट मार्ग नाही. प्रवाशांना केवळ रेल्वे मार्गे प्रवास करावा लागतो. रस्ते मार्गे प्रवास करताना NH-48चा वापर करावा लागतो. हा मार्ग इतकी रहदारी हाताळू शकत नाही त्यामुळे मार्गावर सतत वाहतूक कोंडी होते. हा प्रस्तावित पूल रेल्वे ट्रॅकच्या पश्चिमेकडून बांधला जाणार आहे.मुर्धा गाव येथील नेताजी सुभाषचंद्र मैदानाजवळील उत्तन रोडपासून हा पूल सुरू होईल. पुढे भाईंदरमधील मिठागराच्या जमिनीवरून पंजू बेटाला जोडून वसईच्या खाडीवरून पुढे नायगाव येथे खाली उतरेल. नायगावच्या कुटिन्हो रोडवर हा पूल संपणार आहे.
