Missing Link: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात व्हायची. पण मिसिंग लिंक प्रवाशांसाठी खुला होऊन केवळ 10 दिवस झाले असले तरी सर्व समस्या दूर झाल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ला सुरूवात होऊन 10 दिवस झाले आहेत. या दहा दिवसांमध्येच ‘मिसिंग लिंक’ची कमाल दिसून आली आहे. मार्ग सुरू झाल्यापासून महामार्गावरी वाहतूक कोंडी अगदी नाहीशी झाली आहे. बोरघाटात मे महिना सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी दूर झालेली दिसून येत आहे. सुमारे 70 टक्के हलक्या वाहनांची वाहतूक ‘मिसिंग लिंक’ किंवा ‘कनेक्टिंग लिंक’कडे वळली आहेत. तसेच, घाट मार्गावर कोणतीही दुर्घटना झालेली नसल्यामुळे मिसिंग लिंक प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे हे स्पष्ट झाले आहे.
घाटात वाहनांची संख्या कमी झाली
मे महिन्यात मुंबईहून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने अनेक वाहने निघतात. उन्हाळाच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी होते. वीकेंडदरम्यान तर अनेकदा वाहनांच्या 5-6 किमी लांब रांगा लागतात. त्यात कडक उन्हात थांबल्यामुळे नागरिकांचे अधिक हाल होतात. पण यंदा सुरू झालेल्या या पर्यायी मार्गामुळे सर्व समस्या दूर झाल्या आहेत. सध्या मिसिंग लिंकवर कोणत्याही अवजड वाहनांना वाहतुकीची परवानगी नसल्यामुळे ही 30 टक्के वाहनं घाट मार्गावरूनच प्रवास करतात. पण घाटाती वाहनांची संख्या लक्षणीरित्या कमी झाली आहे. त्यामुळे कोंडी आणि अपघातांची संख्या कमी होऊन प्रवास सुसाट झाला आहे.Virar-Alibaug Corridor: तिसऱ्या मुंबईचा कणा, 104 गावांमधून मार्ग, 6 महामार्गांना जोडणार; 14 पदरी ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’ला मंजुरी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ‘कनेक्टिंग लिंक’ रायगड जिल्ह्यातील खोपोलीपासून सुरू होऊन पुण्यातील कुसगावपर्यंत बांधला आहे. द्रुतगती मार्गावरील धोकादायक वळण असलेली घाट सोडून थेट खोल दरीवरून पूल बांधून आणि सह्याद्रीच्या डोंगरातून बोगदा बनवून हा मार्ग तयार केला आहे. या प्रकल्पासाठी एकूण 6,700 कोटी रुपयांचा खर्च आला. मुंबई ते पुणे द्रुतगती मार्ग 19 किमी लांब आहे आणि मिसिंग लिंक केवळ 13 किमी लांब आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवासात 6 किलोमीटरचे अंतर कमी झाले असून प्रवासात 25-30 मिनिटे वेळ वाचत आहे.
घाटातील अपघातांची संख्याही घटली
द्रुतगती महामार्ग सध्या सहा पदरी असून ‘मिसिंग लिंक’वरील 5.68 किमी लांबीचा मार्ग आठ पदरी आहे. बोरघाट परिसरातील घाट चढताना पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. दुसरीकडे, घाट उतरताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी तीव्र उतार असल्यामुळे अपघातांचा धोका वाढत होता. अनेकदा, वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात व्हायचे. त्यात अवजड वाहनांमुळे या दोन्ही समस्या वाढायच्या.
Thane News: ‘ठाणे-घोडबंदर’ आता सुसाट! रुंदीकरणासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा; ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार
परंतु, मिसिंग लिंकमुळे या दोन्ही समस्या दूर झाल्या आहेत. अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक विभागली असून, गेल्या 10 दिवसांत दोन्ही मार्गांवर कोंडी आणि अपघातांची नोंद झालेली नाही. 2019मध्ये MSRDCकडून या मिसिंग लिंकच्या बांधकामाला सुरूवात झाली होती. त्यानंतर 7 वर्षांनंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. लोणावळा आणि खंडाळ्यासारख्या वाहतूक कोंडीच्या भागांना बायपास करून महामार्गावर दररोज सुमारे 1.5 लाख वाहनं प्रवास करु शकतात.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा