कुंपणावर असलेले लवकरच भाजपमध्ये येतील असं वक्तव्य विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी केलंय. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या प्रमोद जंठार यांनी रत्नागिरीत कमळ फुलणारच असं म्हणत शिवसेना नेते आणि आणि पालकमंत्री उदय सामंत यांना चिमटा काढला. तर २०२९ पर्यंत भाजपचे लोकप्रतिनिधी वाढवणार असल्याचंही जठार यांनी म्हटलंय.