विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाने नव्या राजकीय वादाला तोंड फुटलेय. राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आता मनसेने देखील यात उडी घेतलीय.सोलापुरातील मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.संग्राम भंडारेंनी लवांडेंना नाही, राज्य सरकारच्या तोंडाला काळे फासले, असे ते म्हणाले.इंगळे यांनी नितेश राणे आणि संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.