महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा मुख्यमंत्री पदावरुन दावे आणि प्रतिदावे सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे महायुतीत याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महायुतीत आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महायुतीतच मुख्यमंत्रीपदावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. हा विषय तापण्यामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी केलेलं एक वक्तव्य कारणीभूत ठरलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 2029 च्या निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी इच्छा जय पवार यांनी व्यक्त केली. त्यांनी काल (7 मे) बारामतीत जनता दरबार घेतला. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावी, अशी आशा व्यक्त करुन दाखवली. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जय पवार यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री व्हायला खूप मोठा जनाधार लागतो, आमदाराची संख्या, आणि पाठिंबा लागतो”, असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला. तसेच “2029 मध्ये देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील”, असा विश्वास जयकुमार गोरे यांनी सोलापूर येथे व्यक्त केला.
जय पवार नेमकं काय म्हणाले?
“सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, त्यांनी अजित दादांना मुख्यमंत्री म्हणून एकदा बघायला पाहिजे होतं. आता सुनेत्रा पवार देखील तसे कष्ट घेत आहेत. तर मला असं वाटतं की, 2029 ला वहिनीच उभ्या राहतील. आमची सर्वांची आशा आहे की, वहिनी मुख्यमंत्री म्हणून निवडून गेल्या पाहिजेत”, असं मत जय पवार यांनी काल व्यक्त केलं.
‘…म्हणून जय पवारांना पुढची स्वप्न पडत असतील’, भरत गोगावले यांचा टोला
शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याने जय पवारांना पुढची स्वप्न पडत असतील”, असं मंत्री भरत गोगावले म्हणाले आहेत. “जय पवार यांना इच्छा व्यक्त करायला कुणी रोखू शकत नाही. जे मुखातून शब्द निघून गेले ते परत येत नसतात. जय पवार यांच्या आई चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या. हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे कदाचित त्यांना वाटलं असेल की, आई एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे त्यांना पुढची कदाचित स्वप्न पडली असतील”, अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे.
‘भाजपचा विरोध करावा लागेल’, रोहित पवार यांचा दावा
जय पवार यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री व्हायचं असेल तर भाजपचा विरोध करावा लागेल, असं रोहित पवार म्हणाले आहेत. “महाराष्ट्रात भाजप सोडून दुसऱ्या कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल. त्यामुळे अजित दादांचा शेवटच्या चार महिन्यांमध्ये आपण बघितलं असेल तर अजित दादा सातत्याने भाजपच्या विरोधातच बोलत होते”, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा