• Mon. Jun 15th, 2026

    वैद्यकीय उपचार मिळण्यात साडेपाच तास विलंब, डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी नवी अपडेट, पोस्टमार्टममध्ये काय?

    वैद्यकीय उपचार मिळण्यात साडेपाच तास विलंब, डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी नवी अपडेट, पोस्टमार्टममध्ये काय?

    Mumbai Watermelon Death Case : रुग्णालयात तातडीने दाखल होणे अपेक्षित असताना ते घरीच थांबल्याची माहिती पुढे आली आहे. प्रकृती अधिक बिघडल्यावर चौघांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा दुपारचे सुमारे ११ ते पावणे १२ वाजले होते

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात अन्नातून विषबाधा झाली की, अन्य कारण होते, याचा तपास सुरू असताना वैद्यकीय उपचार मिळण्यात सुमारे साडेपाच तासांचा विलंब झाल्याची बाब फोरेन्सिक व वैद्यकीय तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आली आहे.

    उपचारात विलंब

    जेवणानंतर कलिंगडाचे सेवन केल्यानंतर कुटुंबातील चारही जणांना पोटदुखी, उलट्या व अतिसाराची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर परिसरातील एका डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेण्यात आले. त्यामुळे त्यांना काही काळ आराम मिळाल्याचे सांगितले जाते. मात्र, काही वेळाने त्रास पुन्हा वाढला. अशा स्थितीत रुग्णालयात तातडीने दाखल होणे अपेक्षित असताना ते घरीच थांबल्याची माहिती पुढे आली आहे. प्रकृती बिघडल्यावर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी सुमारे ११ ते पावणे १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना दाखल केल्याचे समजते.

    विषबाधेचे नेमके कारण अद्याप अनिश्चित

    वैद्यकीय उपचारात ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा मानला जातो. या काळात उपचार न झाल्यास लक्षणे गंभीर होण्याची शक्यता वाढते. शवविच्छेदनानंतर घेतलेल्या नमुन्यांच्या प्राथमिक अहवालात तीव्र स्वरूपाची विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, पायधुनी येथील विषबाधेचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.
    Maharashtra TimesMumbai Police Duty Hours : आठ तास ड्युटीचे ‘बारा’ वाजले! आता ’12 तास काम, 24 तास आराम’ संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणी

    कलिंगडाबाबत एफडीएचा अंतिम निष्कर्ष बाकी

    कलिंगडामुळे विषबाधा झाली का, याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून अंतिम निष्कर्ष देण्यात आलेला नाही. संबंधित तपास सुरू असून फोरेन्सिक विभाग व वैद्यकीय तज्ज्ञांचा अंतिम अहवाल अद्याप पोलिसांकडे सादर झालेला नाही. तसेच प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनही अधिक माहिती घेतली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

    सुनेत्रा पवार बारामतीच्या नव्या कारभारी, सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम नावावर

    Watermelon Death Mumbai  Maharashtra Times

    तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मृत्यूचे नेमके कारण केवळ ‘विषशास्त्र अहवाल’ (Toxicology Report) प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. अन्नामध्ये ‘मॉर्फिन’सारखे धोकादायक विषारी पदार्थ असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. जे.जे. मार्ग पोलीस सर्व बाबींचा सखोल विचार करून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
    Maharashtra TimesPune Nasrapur Case : मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबला, नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा; आरोपीची बायको म्हणते, 11 वर्ष संबंध नाही, शिक्षा करा, बॉडीही देऊ नका

    अहवाल प्राप्त होताच केली जाईल कारवाई

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांनी सांगितले की, ठोस पुरावे (म्हणजेच अहवाल) हाती येताच पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल आणि या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर उपाययोजना केल्या जातील. सद्यस्थितीत, या प्रकरणी ‘अपघाती मृत्यूची नोंद’ (ADR) करण्यात आली असून, त्याबाबतचा तपास सुरू आहे. तसेच, या संदर्भात सुमारे डझनभर व्यक्तींचे जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा