• Mon. Jun 15th, 2026

    ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवाल

    ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवाल

    Mumbai Watermelon Death Case : डोकाडिया कुटुंबीयांनी काय खाल्लं, याबद्दलच बोललं जातंय, पण खरा प्रश्न हा आहे की— मॉर्फिन शरीरात शिरलं तरी कसं? हाच या प्रकरणाचा मुख्य गाभा असल्याचं डॉ. झैद कुरेशी म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : पायधुनीत राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात कलिंगडासह बिर्याणी, पाणी यांनाही क्लीन चिट मिळाली आहे. त्यानंतर कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता आपली दिशा बदलत आहे. अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरुन आता या तपासाचं लक्ष एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनुत्तरित प्रश्नाकडे वळले आहे. तो म्हणजे, मॉर्फिन मृतांच्या शरीरात शिरलं तरी कसं?

    दक्षिण मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी, मोगल इमारतीत त्यांच्यावर सर्वप्रथम उपचार करणारे डॉ. झैद कुरेशी म्हणाले की, या प्रकरणाचं आकलन कदाचित अगदी सुरुवातीपासूनच चुकीच्या पद्धतीने केलं गेलं असावं. ‘मिड-डे’ वेबसाईटवर या संदर्भात वृत्त देण्यात आलं आहे.

    मॉर्फिन शरीरात शिरलं कसं?

    “प्रत्येक जण डोकाडिया कुटुंबीयांनी काय खाल्लं, याबद्दलच बोलत आहे. पण खरा प्रश्न हा आहे की— मॉर्फिन शरीरात शिरलं तरी कसं? हाच या प्रकरणाचा मुख्य गाभा आहे,” अस डॉ. झैद कुरेशी म्हणाले. मॉर्फिन हे अत्यंत कडक नियंत्रणाखाली राखलं जाणारं औषध आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. डोकाडिया कुटुंबातील चौघांचे मेंदू, हृदय, आतडे यासारखे ही मुख्य अवयव हिरवे पडल्याचं समोर आलं आहे.

    मॉर्फिनचा वापर कुठे होतो?

    “मॉर्फिनचा वापर केवळ नियंत्रित रुग्णालयीन वातावरणातच केला जातो; तोही प्रामुख्याने असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी. असं औषध एखाद्या सामान्य घरगुती वातावरणात आढळणं, हे अनेक गंभीर प्रश्न निर्माण करणारं आहे” याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधलं.

    भीती हळूहळू ओसरतेय

    मोगल बिल्डिंगमधील डोकाडिया कुटुंबाचा बंद असलेला फ्लॅट रहिवाशांसाठी एक भीतीदायक आठवण बनून राहिला आहे. जे. जे. मार्ग पोलिसांनी सांगितलं की, तपास सुरु असून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा अहवाल सोमवारी अपेक्षित आहे.
    Maharashtra TimesJabalpur Boat Tragedy : आई-भावाची मिठी मारलेली बॉडी पाहिली, चिमुरड्या सियाची रडून वाईट अवस्था, लाईफ जॅकेटबद्दल महत्त्वाची माहिती सांगितली
    नळ बाजारमध्ये फळ विक्रेते सावधपणे पुन्हा व्यवहार सुरु करत आहेत. “दोन दिवस कोणी कलिंगड घेतलंही नाही. आता काही जणांनी पुन्हा फळ विक्रीस सुरुवात केली आहे, पण अजूनही संकोचाने” असं फरदीन ज्यूस सेंटरमधील एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

    Indurikar महाराजांच्या लेकीच्या लग्नात राजकीय मांदियाळी, इंदुरीकरांचं तोंडभरून कौतुक

    बहुतेक विक्रेते अजूनही कलिंगड विकणं टाळून पपई आणि आंबे विकत आहेत. “एकदा तुटलेला विश्वास पुन्हा मिळवायला वेळ लागतो” असं एका स्थानिक रहिवाशाने सांगितलं.

    Mumbai Family Biryani Watermelon Poison Case  Maharashtra Times (1)

    कधी काय घडलं?

    २५ एप्रिल (रात्री): कुटुंबाने नातेवाईकांसोबत बिर्याणी खालली, नंतर चौघांचंच कलिंगड सेवन
    २६ एप्रिल (पहाटे): चौघेही आजारी पडले; तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले
    २६ एप्रिल : काही तासांतच एकामागून एक चौघांचे मृत्यू झाल्याचे वृत्त
    २७-२९ एप्रिल: FDA ने नमुने गोळा केले
    ३० एप्रिलपासून पुढे: अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता फेटाळण्यात आली
    शवविच्छेदन अहवाल: शरीरात मॉर्फिनचे अंश आढळले
    सद्यस्थिती: FSL अहवालाची प्रतीक्षा
    Maharashtra TimesJabalpur Boat Tragedy : माझ्या नणंदेने तिच्या लेकराला मिठीत घट्ट धरुनच प्राण सोडले, शेवटच्या क्षणी काय घडलं, सांगताना वहिनी ढसाढसा रडू लागली

    अन्नातून विषबाधेशी संबंधित शक्यता फेटाळली

    अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) घरातून गोळा करण्यात आलेल्या सर्व नमुन्यांमध्ये कोणतीही भेसळ किंवा विषबाधा झाल्याची शक्यता फेटाळून लावली आहे:
    – कलिंगड
    – बिर्याणी
    – पिण्याचे पाणी
    – मसाले

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा