• Wed. Jun 17th, 2026

    Thane News: रस्त्याच्या मधोमध स्थानकं, 3000 झाडांची कत्तल! ठाणे रिंग मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती

    Thane News: रस्त्याच्या मधोमध स्थानकं, 3000 झाडांची कत्तल! ठाणे रिंग मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती

    Thane Ring Metro: ठाण्यातील रहिवाशांनी ठाणे शहरांतर्गत उभारल्या जाणाऱ्या रिंग मेट्रोला विरोध केला आहे. शाळा, हॉस्पिटल आणि पादचाऱ्यांच्या गर्दीमुळे स्थानकं उभारलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढण्याची भीती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: शहराच्या अंतर्गत मार्गातून धावणारी मेट्रो प्रस्तावित असून त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल अशी आशा होती. परंतु, ठाण्यातील रहिवाशांनीच या मेट्रोच्या बांधकामाला विरोध दर्शवला आहे. रहिवासी आणि नेत्यांनी या मार्गाला विरोध करत यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी वाढेल अशी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाणे रिंग मेट्रोच्या भविष्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

    मेट्रोला विरोध कशामुळे?

    ठाणे मेट्रो रेल, किंवा रिंग रुट म्हणून ओळखली जाणारी ही मार्गिका ठाणे शहरात पश्चिमेकडील व्यावसायिक ठिकाणं आणि रहदारीच्या ठिकाणांमधील कनेकटीव्हिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या घोडबंदर मार्गाशीही ही मेट्रो जोडलेली असणार आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर अनेक स्थानकं प्रस्तावित आहेत. परंतु, ही मार्गिका जरी उन्नत असली तरी स्थानकं जमीनीवरून खांबावरतीच उभारली जाणार आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध खांबांमुळे वाहतूककोंडीची समस्या कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे स्थानिकांनी या मेट्रोला विरोध दर्शवला आहे.Maharashtra TimesMumbai Metro 6: 110 कामगार, 110 टनचे तीन गर्डर, एका रात्रीत पश्चिम रेल्वेर उभारले; मुंबई मेट्रो 6चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

    या परिसरातील काही रहिवशांनी स्थानिक नेत्यांसहमहा मेट्रोच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. हिरानंदानी मेडोझ, रोडास, रुतू इस्टेट आणि हिरानंदानी इस्टेटमधील रहिवाशांनी महा मेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक श्रावण हर्डीकर आणि वरिष्ठ प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार संजय केळकरसुद्धा उसप्थित होते. त्यांच्या मते, शाळा, रुग्णालय आणि पादचाऱ्यांची गर्दी असलेल्या मार्गांवर मेट्रो स्थानकं उभारली तरी वाहतूक कोंडीत वाढ होणार आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करून तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

    कसा आहे रिंग मेट्रोचा मार्ग?

    केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठिंब्यातून ठाणे रिंग मेट्रोसाठी 12,200 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता लवकरच या मेट्रोचं काम सुरू होणार आहे. ही संपूर्ण मार्गिका 29 किमी लांब असून ठाणे पश्चिमेत या मेट्रोच्या 22 स्थानकांचा समावेश आहे. ठाणे रिंग मेट्रोच्या एका बाजूला उल्हास नदी आणि दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असेल.

    Maharashtra TimesMumbai Underground Tunnel: गिरगाव चौपाटीपर्यंत बोगद्याचा विस्तार होणार! ‘ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह’ भुयारी मार्गाचा नवा प्लॅन मंजूर; 5 मिनिटांत प्रवास

    काही रहिवाशांनी तर या मेट्रोची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. शहरांत आधीपासूनच अंतर्गत रस्ते जाळे मजबूत असून घोडबंदर मार्गाचाही विस्तार सुरू आहे. त्यात एका मेट्रोचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. बहुते निवासी क्षेत्र घोडबंदर रस्ता आणि मेट्रो लाइन 4 (वडाळा ते कासारवडवली) पासून केवल 2 ते 3 किमी अंतरावर आहेत. तसेच, पश्चिमेकडील येऊर जंगलापासूनही अवघ्या 1 किमी अंतरावर आहेत. त्यामुळे या मेट्रोची गरज नाही असे त्यांनी सांगितले. स्थानिकांना विश्वासात न घेता सरकार परस्पर निर्णय घेऊन पैसे वाया घालवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

    दरम्यान, ठाणे महानगरपालिकेने या मेट्रो प्रकल्पासाठी 3,000 झाडं तोडण्यास परवानी दिली आहे त्यामुळेही अनेक नागरिक या प्रकल्पाला विरोध करत आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा