Samruddhi Mahamarg: ठाणे शहराला जोडणाऱ्या समुद्धी महामार्गावर पोहोचणं या नव्या कॉरिडोरमुळे सुलभ होणार आहे. शहरातील कोंडी आणि मालवाहतूक वाहनांशिवाय प्रवास शक्य होईल.
ठाणे: मुंबई, ठाणे आणि नागपूर या शहरांदरम्यान प्रवास आता सोपा होणार आहे. मुंबई ते नागपूर जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरील पोहोचताना होणारी कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकारणाने ( MMRDA ) एका नव्या प्रकल्पावर काम सुरू केलं आहे. ठाणे (साकेत) ते आमणेदरम्यान एका उन्नत मार्गाला हिरवा कंदील मिळाला असून एमएमआरडीएने त्या प्रकल्पासाठी वन विभागाकडून मंजुरीसाठी प्रस्ताव मांडला आहे.
वाडपे इंटरचेंजवळ कोंडी
मुंबई ते नागपूर प्रवासासाठी समृद्धी महामार्गामुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवास वेगवान झाला आहे. पण महामार्गावर प्रवेश करताना किंवा महामार्गावरून बाहेर पडतना प्रवाशांना ठाणे आणि मुंबईच्या वाहतूककोंडीतून प्रवास करावा लागतो. या मार्गामुळे विनाअडथळा वाहतूक शक्य होणार आहे. सध्या ठाण्यातील वाडपे इंटरचेंजजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासात अडथळा निर्माण होतो. पण हाच प्रवास या उन्नत मार्गामुळे कोंडीमुक्त होणार आहे.Mumbai News: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड रोडमुळे प्रवास सुस्साट! मुंबईतील कोंडी फोडणारे मार्ग कधी सुरू होणार?
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. एकूण 701 किमी लांब मार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ 17 तासांवरून फक्त 8 तासांवर आला आहे. जून 2025मध्ये इगतपुरी ते आमणे या शेवटच्या 76 किमी लांब टप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित झाला. या महामार्गाचा मार्ग राज्यातील 10 जिल्ह्यांमधून जातो. नागपूर, वर्धी, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे. फीडर नेटवर्कद्वारे तर या महामार्गाने 14 जिल्ह्यांना जोडणी मिळते.
पण आमणेपर्यंत पोहोचल्यावर तिथून पुढचा प्रवास मुंबई आणि ठाणेकरांसाठी कठीण होतो. सध्या या मार्गावर आंजूर, भिवंडी या भागांमध्ये मोठ्या गोदामांता प्रादुर्भाव असल्याने आमणे ते ठाणे या पट्ट्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यात मुंबई-नाशिक महामार्गावर दररोज मलावाहतूक वाहनांची संख्या मोठी असते. 24/7 वाहतूक पोलिस व्यवस्थापन असूनही, परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली नाही, ज्यामुळे एमएमआरडीएने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे.
Mumbai-Pune Missing Link: देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावर भव्य प्रकल्प, ‘मिसिंग लिंक’ म्हणजे नेमकं काय? मार्गाची वैशिष्ट्येही आहेत अनेक
कसा असेल मार्ग?
ठाणे ते आमणे उन्नत मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल 2025मध्येच सादर करण्यात आला होता. हा मार्ग एकूण 21.3 किमी लांब आहे. यापैकी 12.55 किमी भाग उन्नत असेल जो मुंबई-नाशिक महामार्गाच्या बाजूने उभारला जाईल. उर्वरित मार्ग 8.80 किमी लांब असेल. हा संपूर्ण मार्ग सहा पदरी असेल. हा मार्ग ठाण्यातील सध्या काम सुरू असलेल्या आनंदनगर-साकेच उन्नत मार्गाला राजनोली जंक्शनशी जोडणार आहे. त्यापुढे सोनाळे गावातून मुंबई-नाशिक महामार्गावरून उजवीकडे वळून कारवलीला जोडून शेवटी आमणेवर पोहोचेल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा